शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

काळ्या बाजारावर टाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:39 IST

स्वस्त धान्याची वाहतूक करणा-या ७० वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून, दोन महिन्यांत ६४ हजार क्विंटल स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत थेट पोहोचविण्यात आले आहे.

जालना : स्वस्त धान्याच्या काळा बाजाराला आळा बसावा, धान्य वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी जिल्ह्यात स्वस्त धान्याची द्वारपोच वाहतूक केली जात आहे. स्वस्त धान्याची वाहतूक करणा-या ७० वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून, दोन महिन्यांत ६४ हजार क्विंटल स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत थेट पोहोचविण्यात आले आहे.जिल्ह्यात स्वस्त धान्य योजनेचे तीन लाख १९ हजार लाभार्थी आहेत, तर रेशन कार्डधारकांची संख्या तीन लाख ५३ हजार आहे. जिल्ह्यातील १२८० विक्रेत्यांमार्फत लाभार्थ्यांना स्वस्त धान्य वाटप केले जाते. शासनाकडून प्राप्त होणारा तांदूळ, गहू साठविण्यासाठी जालना शहरात अन्न महामंडळाची जिल्हा स्तरावर भोकरदन नाका परिसर व बोरखेडी येथे दोन गोदामे आहेत. या गोदामांतून आठही तालुक्यांतील गोदामांपर्यंत स्वस्त धान्य पोहोचविण्यासाठी यापूर्वी खाजगी वाहनांचा वापर केला जात होता. तालुका स्तरावरील गोदामातून स्वस्त धान्य दुकानदार आपल्या सवडीप्रमाणे न्यायचे. यासाठी त्यांना प्रतिक्विंटल केवळ १९ रुपये वाहतूक खर्च मिळत होता. मात्र, अशा पद्धतीने वाहतूक करताना स्वस्त धान्याचा काळा बाजार होण्याचे प्रकार समोर आले होते. बहुतांश वेळा विक्रेते महिन्याच्या शेवटी गोदामातून धान्य घेऊन जात असल्याने लाभार्थ्यांना या महिन्याचे धान्य पुढील महिन्यात मिळत होते. या सर्व प्रकाराला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने दोन महिन्यांपासून जिल्ह्यात स्वस्त धान्य द्वारपोच वाहतूक यंत्रणा सुरू केली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात या माध्यमातून ४० हजार क्विंटल गहू व २४ हजार क्विंटल तांदूळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांनी दिली.