शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मंदीतही मध्यवर्ती बँकेची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 21:21 IST

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मंदीतही ठेवींमध्ये झालेली वाढ लक्षणीय ठरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मंदीतही ठेवींमध्ये झालेली वाढ लक्षणीय ठरली आहे. नुकतीच मध्यवर्ती बँकेची सर्व साधारणसभा पार पडली. यावेळी गेल्या तीन महिन्यात बँकेच्या ठेवी २८२ कोटी रूपयांवरून ४५२ कोटीवर पोचल्या आहे. बँकेच्या स्वत:च्या गुंतवणूकीतही वाढ झाली असून, कर्ज वसूलीचा टक्का घसरल्याने चिंता कायम आहे. या बँकेने २९० कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले होते. पैकी केवळ ५० कोटी रूपयेच वसूल झाले आहेत.बँकेची सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन मनोज मरकड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संचालक माजी आ. अरविंद चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे, पांडुरंग जन्हाड, चंद्रमणी खरात. यांच्यासह अन्य संचालक तसेच अधिकारी पी.बी. कवठे, विशेष कार्य संचालन अधिकारी डी.एम. पालोदकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांनी केले. त्यांनी बँकेने गेल्या काही वर्षात केलेल्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडला. दुष्काळ असतांनाही या बँकेच्या ठेवींमध्ये यंदा १७० कोटी रूपयांची वाढ झाल्याचे सांगितल्यावर त्याचे सर्वांनी स्वागत केले. बँंकेचे अध्यक्ष मनोज मरकड यांच्यासह अन्य संचालक मंडळाच्या सहकार्यानेच हे शक्य झाल्याचे देशमुख म्हणाले.यावेळी मरकड म्हणाले की, आम्ही नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपले आहे. शेतकºयांना पीकविमा, पीककर्ज देण्यासाठी बँकेने राष्ट्रीकृत बँकापेक्षाही चांगले काम केल्याचे सांगितले. भविष्यातही बँक आणखी नवनवीन योजना राबवून शेतकºयांना चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.बँकेतील सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी अपुरी संख्या असतांनाही जे काम केले. त्यामुळे बँकेला तीन महत्वाचे पुरस्कार मिळाल्याचेही मरकड यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. या बँकेस बँकींग फ्रंटीयर संस्थेतर्फे उत्कृष्ट चेअरमन, उत्कृष्ट व्यवस्थापन तसेच उत्कृष्ट उलाढाल यांचा त्यात समावेश असल्याचे मरकड म्हणाले. संचालन पाडुरंग ज-हाड यांनी केले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीInvestmentगुंतवणूक