शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

आडनावावरून ठेवली स्मशानभूमीची नावे; वाचा १५ स्मशाने असलेल्या गावाची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 17:13 IST

आठ हजार लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल पंधरा स्मशानभूमी आहेत.

ठळक मुद्देअखेरच्या प्रवासाला तरी अडचण नाही ! कथा तब्बल १५ स्मशाने असलेले पिंपळगाव रेणुकाई गावाची  

- फकिरा देशमुख 

भोकरदन (जि. जालना) : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई हे स्मशानभूमीचा सुकाळ असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव ठरले आहे़ तालुक्यात १५७ गावे असून आजही बहुतांश गावांत स्मशानभूमीसाठी साधे टीनपत्र्याचे शेडसुध्दा नाही. मात्र पिंपळगाव रेणुकाई या आठ हजार लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल पंधरा स्मशानभूमी आहेत. त्यापैकी आठ स्मशानभूमीसाठी बांधकाम करण्यात आले आहे. एक मुस्लिम बांधवांचे कब्रस्तान आहे. सहा ठिकाणी अद्यापही उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत

या गावात अठरापगड जातींचे वास्तव्य असून चांगला एकोपाही आहे. कधीही या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण झालेली नाही.  असे असले तरी या गावात्त जातीपेक्षा आडनावावर स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले आहे.  एकाच समाजासाठी दुसरी स्मशानभूमी जि. प.च्या तत्कालीन सभापती वर्षा देशमुख यांनी २०१३-१४ मध्ये देशमुख समाजबांधवांसाठी स्मशानभूमीचे बांधकाम केले.  त्यानंतर चंद्रकांत दानवे यांच्या निधीतून याच समाजासाठी दुसरी स्मशानभूमी बांधली. 

मराठा समाजाच्या पाच स्मशानभूमीमराठा समाजाच्या सास्ते, नरवाडे, आहेर, गावंडे, गाडेकर अशा पाच स्मशानभूमी वेगळ्या आहेत. वाणी, बारी, नाथजोगी समाजाच्या आडनावाप्रमाणे दोन, तर ब्राह्मण, दलित, वडार यांच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत.

२०१०नंतर झाले आडनावाप्रमाणे बांधकाम२०१० पर्यंत कोठेच स्मशानभूमीचे पक्के बांधकाम केलेले नव्हते,  मात्र तत्कालीन जि. प. सभापती मनिष श्रीवास्तव यांनी मराठा समाजासाठी एका स्मशानभूमीचे बांधकाम केले. त्यानंतर जातीपेक्षाही आडनावाप्रमाणे बांधकाम करण्यात आले. या शासनाच्या जागेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या नात्याप्रमाणे नागरिक कोणा कुटुंबियाचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार करीत होते. नंतर मात्र चित्र बदलत गेले. सध्या केवळ  वडार व न्हावी समाजासाठी स्मशानभूमी नाही. 

टॅग्स :SocialसामाजिकJalanaजालनाDeathमृत्यू