शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

अस्मानी संकटाचा कहर; गोठ्यावर वीज पडल्याने दोन बैल, आठ शेळ्यांसह ३० कोंबड्या जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 18:59 IST

महसूल व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत घटनास्थळीच पंचनामा करण्यात आला.

ठळक मुद्दे शेतकऱ्याचे जवळपास ३ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान शेतकरी कुटुंबाला अश्रू अनावर

आव्हाना (जि. जालना) : वीज पडल्याने गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैल, आठ शेळ्यांसह ३० कोंबड्या जळून खाक झाल्या. ही घटना भोकरदन तालुक्यातील दगडवाडी शिवारात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

दगडवाडी येथील हिंमतराव पांडे यांचे गावच्या शिवारात शेत आहे. पांडे यांनी शुक्रवारी रात्री शेतातील गोठ्यात चार बैल, १० शेळ्या बांधल्या होत्या. या गोठ्यातच ३० गावरान कोंबड्यांसह इतर शेती उपयोगी साहित्य होते. या गोठ्यावर शनिवारी पहाटे अचानक वीज पडली. वीज पडल्याने गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैल, ८ शेळ्या व ३० कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच शेती उपयोगी साहित्यही जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर दोन बैलं आणि दोन शेळ्यांना गोठ्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, तेही गंभीर होरपळले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रा. अंकुश जाधव यांना घटनास्थळास भेट देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच महसूल व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत घटनास्थळीच पंचनामा करण्यात आला. या घटनेत हिंमतराव पांडे यांचे जवळपास ३ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे. दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले असून, प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ अधिकाधिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

शेतकरी कुटुंबाला अश्रू अनावरवीज पडल्याने लागलेल्या आगीत जनावरे जळून खाक झाल्याची माहिती समजताच पांडे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बैल, शेळ्यांसह कोंबड्यांची झालेली राख पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. पांडे कुटुंबिय बैलांसह इतर जनावरांचा सांभाळ मोठ्या प्रेमाने करीत होते. त्यांचा मुलगा सतीश हा बैलांचा संभाळ करण्यावर आघाडीवर असायचा. मात्र, त्याच बैलांचा आगीत मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचेही अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीfireआगJalanaजालना