शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी संकटाचा कहर; गोठ्यावर वीज पडल्याने दोन बैल, आठ शेळ्यांसह ३० कोंबड्या जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 18:59 IST

महसूल व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत घटनास्थळीच पंचनामा करण्यात आला.

ठळक मुद्दे शेतकऱ्याचे जवळपास ३ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान शेतकरी कुटुंबाला अश्रू अनावर

आव्हाना (जि. जालना) : वीज पडल्याने गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैल, आठ शेळ्यांसह ३० कोंबड्या जळून खाक झाल्या. ही घटना भोकरदन तालुक्यातील दगडवाडी शिवारात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

दगडवाडी येथील हिंमतराव पांडे यांचे गावच्या शिवारात शेत आहे. पांडे यांनी शुक्रवारी रात्री शेतातील गोठ्यात चार बैल, १० शेळ्या बांधल्या होत्या. या गोठ्यातच ३० गावरान कोंबड्यांसह इतर शेती उपयोगी साहित्य होते. या गोठ्यावर शनिवारी पहाटे अचानक वीज पडली. वीज पडल्याने गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैल, ८ शेळ्या व ३० कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच शेती उपयोगी साहित्यही जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर दोन बैलं आणि दोन शेळ्यांना गोठ्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, तेही गंभीर होरपळले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रा. अंकुश जाधव यांना घटनास्थळास भेट देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच महसूल व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत घटनास्थळीच पंचनामा करण्यात आला. या घटनेत हिंमतराव पांडे यांचे जवळपास ३ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे. दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले असून, प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ अधिकाधिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

शेतकरी कुटुंबाला अश्रू अनावरवीज पडल्याने लागलेल्या आगीत जनावरे जळून खाक झाल्याची माहिती समजताच पांडे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बैल, शेळ्यांसह कोंबड्यांची झालेली राख पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. पांडे कुटुंबिय बैलांसह इतर जनावरांचा सांभाळ मोठ्या प्रेमाने करीत होते. त्यांचा मुलगा सतीश हा बैलांचा संभाळ करण्यावर आघाडीवर असायचा. मात्र, त्याच बैलांचा आगीत मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचेही अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीfireआगJalanaजालना