शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

अस्मानी संकटाचा कहर; गोठ्यावर वीज पडल्याने दोन बैल, आठ शेळ्यांसह ३० कोंबड्या जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 18:59 IST

महसूल व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत घटनास्थळीच पंचनामा करण्यात आला.

ठळक मुद्दे शेतकऱ्याचे जवळपास ३ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान शेतकरी कुटुंबाला अश्रू अनावर

आव्हाना (जि. जालना) : वीज पडल्याने गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैल, आठ शेळ्यांसह ३० कोंबड्या जळून खाक झाल्या. ही घटना भोकरदन तालुक्यातील दगडवाडी शिवारात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

दगडवाडी येथील हिंमतराव पांडे यांचे गावच्या शिवारात शेत आहे. पांडे यांनी शुक्रवारी रात्री शेतातील गोठ्यात चार बैल, १० शेळ्या बांधल्या होत्या. या गोठ्यातच ३० गावरान कोंबड्यांसह इतर शेती उपयोगी साहित्य होते. या गोठ्यावर शनिवारी पहाटे अचानक वीज पडली. वीज पडल्याने गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैल, ८ शेळ्या व ३० कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच शेती उपयोगी साहित्यही जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर दोन बैलं आणि दोन शेळ्यांना गोठ्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, तेही गंभीर होरपळले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रा. अंकुश जाधव यांना घटनास्थळास भेट देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच महसूल व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत घटनास्थळीच पंचनामा करण्यात आला. या घटनेत हिंमतराव पांडे यांचे जवळपास ३ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे. दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले असून, प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ अधिकाधिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

शेतकरी कुटुंबाला अश्रू अनावरवीज पडल्याने लागलेल्या आगीत जनावरे जळून खाक झाल्याची माहिती समजताच पांडे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बैल, शेळ्यांसह कोंबड्यांची झालेली राख पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. पांडे कुटुंबिय बैलांसह इतर जनावरांचा सांभाळ मोठ्या प्रेमाने करीत होते. त्यांचा मुलगा सतीश हा बैलांचा संभाळ करण्यावर आघाडीवर असायचा. मात्र, त्याच बैलांचा आगीत मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचेही अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीfireआगJalanaजालना