शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

जात पडताळणी समितीने वाढवली कामकाजाची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:49 IST

विशेष म्हणजे १० ते १५ जून या पाच दिवसांत १६४ पैकी १५१ जणांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ज्या विद्यार्थ्यांना शासनाच्या आरक्षण कोट्यातून व्यावसायिक, अभियांत्रिकीसह आर्किटेक्ट, एमबीबीएस, बीडीएस, फार्मसीसाठी प्रवेश घेताना जात पडताळणी समितीकडून संमत केलेले प्रमाणपत्र गरजेचे असते. यासाठी पूर्वी यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या खेट्या घालाव्या लागत होत्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाने यात दखल दिल्याने आता हे काम समाज कल्याण विभागाकडून गतीने पूर्ण केले जात असल्याचे चित्र आहे.दहावी, बारावीसह अन्य परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे आता सर्वत्र प्रवेशाची लगीनघाई सुरू आहे. यातच आरक्षित प्रवर्गात येणाऱ्या एससी, व्हीजीएनटी, ओबीसी, एसबीसी तसेच नव्यानेच लागू झालेले मराठा समाजाचे आरक्षण या आरक्षित जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना जात पडताळणी समितीकडून त्यांच्या जातीचे प्रमाणत्र वैध करून घ्यावे लागते. पूर्वी यासाठी समाज कल्याण विभागाकडे मोठ्या प्रमाणावर ताण येत होता. याही वेळी तो आहे, परंतु यात सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना त्यांचे जात प्रमाणपत्र प्रवेशाच्या दुसºया फेरीची अंतिम यादी लागण्याच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेतले जात आहे. या मुदतीत जर हे प्रमाणत्र न मिळाल्यास त्याला जबाबदार हा विद्यार्थीच राहणार आहे.त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेऊन पालकांनी देखील यावेळी फार पूर्वीपासूनच जात पडताळणी समितीकडे संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्याचे दिसून आले. जालना जिल्ह्याचा विचार केल्यास गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास ९८५ अर्ज प्राप्त झाले होते, पैकी जवळपास ७०० जणांना त्यांची पडताळणी करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे १० ते १५ जून या पाच दिवसांत १६४ पैकी १५१ जणांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Caste Certificateजात वैधता प्रमाणपत्रEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी