शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जात पडताळणी समितीने वाढवली कामकाजाची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:49 IST

विशेष म्हणजे १० ते १५ जून या पाच दिवसांत १६४ पैकी १५१ जणांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ज्या विद्यार्थ्यांना शासनाच्या आरक्षण कोट्यातून व्यावसायिक, अभियांत्रिकीसह आर्किटेक्ट, एमबीबीएस, बीडीएस, फार्मसीसाठी प्रवेश घेताना जात पडताळणी समितीकडून संमत केलेले प्रमाणपत्र गरजेचे असते. यासाठी पूर्वी यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या खेट्या घालाव्या लागत होत्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाने यात दखल दिल्याने आता हे काम समाज कल्याण विभागाकडून गतीने पूर्ण केले जात असल्याचे चित्र आहे.दहावी, बारावीसह अन्य परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे आता सर्वत्र प्रवेशाची लगीनघाई सुरू आहे. यातच आरक्षित प्रवर्गात येणाऱ्या एससी, व्हीजीएनटी, ओबीसी, एसबीसी तसेच नव्यानेच लागू झालेले मराठा समाजाचे आरक्षण या आरक्षित जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना जात पडताळणी समितीकडून त्यांच्या जातीचे प्रमाणत्र वैध करून घ्यावे लागते. पूर्वी यासाठी समाज कल्याण विभागाकडे मोठ्या प्रमाणावर ताण येत होता. याही वेळी तो आहे, परंतु यात सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना त्यांचे जात प्रमाणपत्र प्रवेशाच्या दुसºया फेरीची अंतिम यादी लागण्याच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेतले जात आहे. या मुदतीत जर हे प्रमाणत्र न मिळाल्यास त्याला जबाबदार हा विद्यार्थीच राहणार आहे.त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेऊन पालकांनी देखील यावेळी फार पूर्वीपासूनच जात पडताळणी समितीकडे संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्याचे दिसून आले. जालना जिल्ह्याचा विचार केल्यास गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास ९८५ अर्ज प्राप्त झाले होते, पैकी जवळपास ७०० जणांना त्यांची पडताळणी करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे १० ते १५ जून या पाच दिवसांत १६४ पैकी १५१ जणांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Caste Certificateजात वैधता प्रमाणपत्रEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी