शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

शौचालय नसल्यामुळे सरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 01:12 IST

स्वत:च्या घरी शौचालय नसल्यामुळे अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील सरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यत्व औरंगाबाद उच्च न्यायालयाने रद्द केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करोहिलागड : स्वत:च्या घरी शौचालय नसल्यामुळे अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील सरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यत्व औरंगाबाद उच्च न्यायालयाने रद्द केले आहे.रोहिलागड येथील ग्रामपंचायतची निवडणूक १ नोव्हेंबर २०१५ रोजी झाली होती. या निवडणुकीत शिल्पा राम दुधाटकर यांची सरपंच म्हणून निवड झाली होती. मात्र एक वर्षाच्या आतच शिल्पा दुधाटकर यांच्यावर अविश्वास दाखल करून अश्विनी वैद्य यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारला होता. परंतु, शिल्पा दुधाटकर यांनी सरपंच अश्विनी वैद्य यांच्यासह इतर पाच सदस्यांनी शौचालय असल्याबाबतचे प्रमाणपत्र, अतिक्रमण केलेली जागा, नामनिर्देशन सादर करताना आवश्यक असलेला ग्रामसभेचा ठराव सादर न केल्याच्या विरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. परंतु, येथे न्याय न मिळाल्याने शिल्पा दुधाटकर यांनी अप्पर आयुक्तांकडे तक्रार केली होती. यावेळी अप्पर आयुक्तांनी अश्विनी वैद्य यांच्यासह पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते.या निकालाच्या विरोधात अश्विनी वैद्यसह पाच सदस्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ७ जानेवारी रोजी सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने अप्पर आयुक्तांचा निकाल कायम ठेवून सरपंच अश्विनी वैद्य यांच्यासह सदस्य नानासाहेब भाऊराव मगरे, संगीता प्रल्हाद वैद्य, सत्यशीला तुळजीराम पांढरे, कमलबाई सदाशिव काळुंके व मीराबाई कल्याण टकले यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत