शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टमनच्या खांद्यावर शासकीय पत्रांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 01:07 IST

जालना शहरातील पोस्टमनची संख्या अपुरी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सोशल मीडियाचा वापर वाढला आणि पोस्टातून जाणारी कौटुंबिक पत्रे जणू बंद झाली! कौटुंबिक पत्र पोहोचविण्याचे काम कमी झाले असले तरी पोस्टमनच्या खांद्यावर शासकीय कागदपत्रांचा भार वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत जालना शहरातील पोस्टमनची संख्याही अपुरी आहे. तर दुसरीकडे पोस्टात सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंन्टस बँक, पोस्ट बँक सेवेचा जिल्ह्यातील २५ हजाराहून अधिक ग्राहक लाभ घेत असून, यात ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.काही वर्षांपूर्वी दूर राहणाऱ्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचे माध्यम पत्रव्यवहार हा होता. एकमेकांची सुख, दु:खं, कार्यक्रमांचे निमंत्रण, घटना-घडामोडी आदींचा उल्लेख असणारे पत्र्यवहार अधिक प्रमाणात होत असत. मात्र, सोशल मीडियाचा वापर वाढला आणि दूर गावातीलच नव्हे तर विदेशातील नातेवाईकाही थेट संपर्कात आले. त्यामुळे आपसूकच पोस्ट कार्यालयातून होणारा कौटुंबिक पत्रव्यवहार हा कमी झाला. असे असला तरी शासकीय पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बँका, महसूल, पोलीस, न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह इतर विविध शासकीय कार्यालयातील पत्रांचा भार पोस्ट कार्यालयावर दिवसेंदिवस वाढत आहे.जालना येथील पोस्ट कार्यालयात १७ पोस्टमन कार्यरत आहेत. यात जुना जालना भागात ७ तर नवीन जालना भागात १० पोस्टमन कार्यरत आहेत. मात्र, दैनंदिन येणाºया कागदपत्रांची संख्या पाहता पोस्टमन अपुरे पडत आहेत. शहराचा वाढलेला विस्तार आणि कार्यालयावरील वाढलेला कामाचा ताण पाहता पोस्टमनची संख्या वाढविणे गरजेचे आहे.पोस्ट बँक आणि इंडिया पोस्टल पेमेंट बँकेतून व्यवहार करण्याकडे शहरी, ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. विविध बिलांचा भारणा, बचत खात्यांचा व्यवहार, मोबाईल रिचार्ज, शिषवृत्ती, मनरेगाच्या पैशांची देवाण-घेवाण, कृषी संबंधित कामे, गरजुंना तात्काळ पैसे पाठविणे, पेन्शन, डीबीटीचा लाभ आदी विविध व्यवहार या बँकेद्वारे करता येत आहेत. मोबाईलवरील अ‍ॅॅपवरूनही हे सर्व व्यवहार होत असल्याने ग्राहकांचा कल वाढला आहे. जालना येथील मुख्य पोस्ट कार्यालयासह जिल्ह्यातील १९७ शाखांमधून आजवर जवळपास २५ हजाराहून अधिक ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेणे सुरू केले आहे.

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसCentral Governmentकेंद्र सरकार