शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
3
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
4
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
5
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
6
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
7
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
8
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
9
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
10
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
11
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
12
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
13
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
14
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
15
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
16
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
17
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

‘संघाला’ संविधानाच्या कक्षेत आणावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:54 IST

जालना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी काँग्रेसने आश्वासन दिल्यासच त्यांच्या सोबत युती करू, मात्र काँग्रेसकडून तसे आश्वासन ...

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : काँग्रेसने आश्वासन दिल्यासच त्यांच्या सोबत

जालना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी काँग्रेसने आश्वासन दिल्यासच त्यांच्या सोबत युती करू, मात्र काँग्रेसकडून तसे आश्वासन दिले जात नसल्याने युती बाबतच्या निर्णयावर अंतिम ठसा उमटला नसल्याची माहिती भारिप-बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मोदी सरकारवर तिखट हल्ला चढवत आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे निवडणुक जुमला असल्याचे संगून, सरकारडे पैसे नसताना केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केल्याचेही आंबेडकर म्हणाले.

येथील आझाद मैदानावर वंचित आघाडीची सभा शुक्रवारी रात्री पार पडली. यावेळी आ. इप्तीयाज जलील, लक्ष्मण माने यांच्यासह जालन्यातील वंचित आघाडीचे अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे जाहीर केले, मात्र शेतमाल खरेदीसाठी तशी यंत्रणा उभी केली नाही. बाजार समितीवर हमीभाव खरेदीची सक्ती करावी नसता त्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. राम मंदिराच्या मुद्यावर पंतप्रधान न्यायालयाचा निर्णय माना असे सांगत असतानाच हिंदूत्ववादी संस्थांनी सरकारला २१ फेब्रवारीला मंदिर उभारणीचा इशारा देत आहेत, या त्यांच्या इशाऱ्याला सरकारचा छुपा पाठिंबा असल्याचे ही आंबेडकर म्हणाले. राम मंदिराच्या मुद्यावरून देशात दंगली होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडी आणि भारिप-बहुजन महासंघाने जिल्हा निहाय शांती मोर्चा काढण्याचे, त्याचे नियोजन करण्याचे आवाहनही केले.आरक्षणाच्या मुद्यावरूनही त्यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. मंडल आयोगाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले असून, फडणवीस सरकारे मराठा समाजाला देखील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासाच्या मुद्यावरून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यामुळे ओबीसी समाजात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आरक्षणाचे प्रमाणपत्र देताना त्यावर मंडल आयोगानुसार आरक्षण आणि मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या प्रमाणपत्रावर फडणविसांकडून मिळालेले आरक्षण असे नमूद करण्याचा टोलाही लगावला.अर्थ संकल्पात तीन लाख कोटी बँक बुडव्यांकडून वसूल केल्याचा दावा सरकार करत आहे, मात्र रिझर्व बँकेने या संदर्भात अशी वसुली झाली नसल्याचा खुलासा केला आहे, त्यामुळे मोदी सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसने आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्यास सज्ज असल्याचा इशाराही त्यांनी काँग्रेस पक्षाला दिला आहे.

टॅग्स :JalanaजालनाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर