शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST

पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य जालना : जालना- भोकरदन महामार्गावरील गिरीजा-पूर्णा नदी पात्रावरील पुलावर डांबर उखडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या ...

पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य

जालना : जालना- भोकरदन महामार्गावरील गिरीजा-पूर्णा नदी पात्रावरील पुलावर डांबर उखडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या शिवाय पुलाचे कठडे ही जागोजागी तुटले असून, दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार

पारडगाव : येथील सुभेदार बाबा मंदिर जवळ रोहित्राला मंजुरी मिळालेली होती. मात्र, महावितरण कंपनीची अधिकारी, ग्रामस्थांनी सुभेदार बाबा मंदिर जवळ मंजूर झालेले रोहित्र शेतात नेऊन बसवले. या बाबत तक्रार अर्ज माजी सरपंच रवींद्र ढेरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल सातपुते यांनी घनसांवगी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन

शहागड: अंबड तालुक्यातील काही शेतकऱ्यांना गोदावरी नदीवर मुख्यमंत्री सौर कृषी पंप मंजूर झालेले आहे; परंतु संबंधित कंपनी नियमानुसार सर्व साहित्य देत नाही. याकडे लक्ष द्यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नामदेव घोडके, मुक्ताबाई शेलकर यांनी दिला आहे.

वीस दिवसाआड पाणीपुरवठा

बदनापूर : बदनापूर नगरपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात २० ते २५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तर दुसरीकडे जागोजागी पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया जात आहे. त्यामुळे न.प.च्या या कारभारामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

वीस दिवसाआड पाणीपुरवठा

बदनापूर : बदनापूर नगरपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात २० ते २५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तर दुसरीकडे जागोजागी पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया जात आहे. त्यामुळे न.प.च्या या कारभारामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

समन्वयकपदी मुरली सुरासे यांची निवड

जालना : महाएनजीओ फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी मुरली सुरासे व लक्ष्मण मदन यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक मुख्य संयोजक शेखर मुंदडा, मुख्य समन्वयक विजय वरुडकर यांनी केली आहे. महाएनजीओ फेडरेशच्या अतंर्गत २ हजार पेक्षा जास्त संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

योजनेसाठी प्रस्ताव सादर करा

जालना: मत्स्य व्यवसायात शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून निलक्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी २०२०-२०२१ ते २०२४-२०२५ या पाच आर्थिक वर्षांमध्ये करण्यात येणार आहे. या योजनेचा २०२१-२०२२ साठीचा कृती आराखडा शासनास सादर करावयाचा आहे. लाभार्थींनी योजनेचा १५ दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले.

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जालना : शिवजन्मोत्सव समिती व स्वराज्य मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन वसाहत येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा विशेष सरकारी अभियोक्ता दीपक कोल्हे, संतोष गाजरे, अरविंद देशमुख, अशोक पडूळ, राजू काणे, अभिमन्यू खोतकर हे उपस्थित होते.