शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकेच प्रेरणादायी -अपर्णा पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

जालना : आयुष्याचा मार्ग निवडताना आपण जसा विचार करतो, तसाच संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकांचा केला पाहिजे, तेव्हाच परिवर्तन होते, ...

जालना : आयुष्याचा मार्ग निवडताना आपण जसा विचार करतो, तसाच संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकांचा केला पाहिजे, तेव्हाच परिवर्तन होते, असे प्रतिपादन प्राचार्या अपर्णा पवार यांनी केले. गुरुवारी साने गुरुजी जयंतीनिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.

शहरातील श्रीमती दानकुंवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जालना शाखेतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या अपर्णा पवार या होत्या. यावेळी साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदावर्ते, जिल्हाप्रमुख कार्यवाह आर. आर. जोशी, उपाध्यक्ष प्रा. दिगंबर दाते, कोषाध्यक्ष संतोष लिंगायत, कवी कैलास भाले, रामदास कुलकर्णी, पांडुरंग वाजे, संदीप इंगोले, उमाकांत बोमनाळे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्राचार्या पवार म्हणाल्या, आज सर्व घटकांतील वातावरण बदलले आहे. युवतींनी आपली आयुष्याची दिशा ठरविताना प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांची संगत धरली पाहिजे. मुलींनी आत्मविश्वासपूर्ण परिस्थितीचे आकलन करून पुढे जावे, असा सल्लाही पवार यांनी दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह आर. आर. जोशी यांनी साने गुरुजी कथामालेच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमात साने गुरुजी कथामालेच्या सहकार्याने देण्यात आलेल्या पुस्तकांचा संच विद्यालयास देण्यात आला. सूत्रसंचालन रोहिणी कुलकर्णी व किरण शर्मा यांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका शुक्ला, सतीश संचेती, देशपांडे, सानप यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

फोटो

जालना : शहरातील श्रीमती दानकुंवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्या अपर्णा पवार, आर. आर. जोशी, डॉ. सुहास सदावर्ते, प्रा. दिगंबर दाते आदी.