शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकेच प्रेरणादायी -अपर्णा पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

जालना : आयुष्याचा मार्ग निवडताना आपण जसा विचार करतो, तसाच संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकांचा केला पाहिजे, तेव्हाच परिवर्तन होते, ...

जालना : आयुष्याचा मार्ग निवडताना आपण जसा विचार करतो, तसाच संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकांचा केला पाहिजे, तेव्हाच परिवर्तन होते, असे प्रतिपादन प्राचार्या अपर्णा पवार यांनी केले. गुरुवारी साने गुरुजी जयंतीनिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.

शहरातील श्रीमती दानकुंवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जालना शाखेतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या अपर्णा पवार या होत्या. यावेळी साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदावर्ते, जिल्हाप्रमुख कार्यवाह आर. आर. जोशी, उपाध्यक्ष प्रा. दिगंबर दाते, कोषाध्यक्ष संतोष लिंगायत, कवी कैलास भाले, रामदास कुलकर्णी, पांडुरंग वाजे, संदीप इंगोले, उमाकांत बोमनाळे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्राचार्या पवार म्हणाल्या, आज सर्व घटकांतील वातावरण बदलले आहे. युवतींनी आपली आयुष्याची दिशा ठरविताना प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांची संगत धरली पाहिजे. मुलींनी आत्मविश्वासपूर्ण परिस्थितीचे आकलन करून पुढे जावे, असा सल्लाही पवार यांनी दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह आर. आर. जोशी यांनी साने गुरुजी कथामालेच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमात साने गुरुजी कथामालेच्या सहकार्याने देण्यात आलेल्या पुस्तकांचा संच विद्यालयास देण्यात आला. सूत्रसंचालन रोहिणी कुलकर्णी व किरण शर्मा यांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका शुक्ला, सतीश संचेती, देशपांडे, सानप यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

फोटो

जालना : शहरातील श्रीमती दानकुंवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्या अपर्णा पवार, आर. आर. जोशी, डॉ. सुहास सदावर्ते, प्रा. दिगंबर दाते आदी.