शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कुस्ती स्पर्धेपासून भाजप दोन हात दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 01:00 IST

पाच दिवसांच्या कुस्ती स्पर्धेत भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावताना एक औपचारिकता दिसून येत होती. कुठल्याच कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद या पक्षाच्या नेत्यांनी दिला नसल्याने या बाबत उलट चर्चेला उधाण आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अस्सल हिंदुस्थानी खेळ असलेल्या कुस्तीला राजाश्रय मिळवून देण्याचे काम महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने जालन्यात १९ ते २३ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या पाच दिवसांच्या कुस्ती स्पर्धेत भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावताना एक औपचारिकता दिसून येत होती. कुठल्याच कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद या पक्षाच्या नेत्यांनी दिला नसल्याने या बाबत उलट चर्चेला उधाण आले आहे.गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढणार म्हणून अप्रत्यक्षपणे जाहीर केले आहे. अद्याप त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नसली तरी, त्यांनी दोन महिन्यांपूर्वी भोकरदन येथे पत्रकारांशी बोलातना लोकसभा लढण्याचे संकेत दिले होते.यावरूनच आता शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय व्दंद्व सुरू आहे. गेल्या चारही निवडणूकीत खा. दानवे यांनी काँग्रेसचा पराभव केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या समोर जर खोतकर यांनी उमेदवारी भरल्यास ही लढत तुल्यबळ होणार आहे. त्यातच खोतकर आणि दानवे यांचे राजकीय संबंध हे जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सारखेच आहेत. त्यातच अर्जुन खोतकर हे पैठणचे जावई असल्याने त्यांचे पाहुणे देखील त्या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत.विशेष म्हणजे कुस्ती स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेवर नजर टाकली असता, पैठणचे आ. संदीपान भुमरे, सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांचा आवर्जून उल्लेख आहे. त्यातच संदीपान भुमरे यांनी उद्घाटन सोहळ्यास हजेरी लावली होती. उद्घाटन सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हजेरी लावली. परंतु बक्षीस वितरण कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असल्याचे संयोजकांनी जाहीर केले होते. परंतु ते आले नाहीत. यामागे देखील भाजपचे राजकारण असल्याची चर्चा आहे.कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे देखील गोंदिया येथे गेल्याने त्यांची अनुपस्थिती देखील चर्चेचा विषय ठरली. असे असले तरी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बक्षीस वितरणास ऐन वेळी हजेरी लावून शरद पवारांचा शुभेच्छा संदेशही वाचून दाखवला.यावेळी आ. राजेश टोपे हे मात्र उद्घाटन आणि बक्षीस वितरणास आवर्जून उपस्थित होते. विशेष म्हणजे ही कुस्ती सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष एक दिवस जालन्यात असतानाही ते कुस्तीच्या मैदानाकडे फिरकले नाहीत.व्यस्त कार्यक्रमांमुळे गैरहजेरीज्या दिवशी या कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम होता, त्या दिवशी आपले अन्यत्र पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने आपण येऊ शकलो नसल्याचे खासदार दानवेंनी सांगितले. कुस्ती हा आपला देखील आवडीचा खेळ असून, गैरहजर राहण्यामागे कुठलेच राजकीय कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.- खा.रावसाहेब दानवे, जालना

टॅग्स :Wrestlingकुस्तीBJPभाजपा