शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

"...तर ते सरकार जागेवर राहत नाही", जालन्यातून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 15:00 IST

पाणी प्रश्नावर औरंगाबादप्रमाणे जालन्यातही भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

जालना: पाणी प्रश्नावर काही दिवसांपूर्वी भाजपने औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चा काढला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या मोर्चाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर आता उद्योगनगरी असलेल्या जालना शहरातील पाणीप्रश्नासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रस्त्यावर उतरून जल आक्रोष मोर्चा काढला. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी सत्ताधारी सरकारवर सडकून टीका केली.

'आम्ही जालन्याला निधी दिला'"अडीच वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहात, 129 कोटी रुपयांचे काय केले? नाकर्तेपणामुळे पाणी देता येत नाही, तेच असे प्रश्न विचारात आहेत. पाणीप्रश्नावर भाजप काय उपाय करणार, सरकारकडे पैसे आहेत. रावसाहेब दानवे यांच्यामुळेच 129 कोटी रुपये जालन्याला मिळाले आहेत. आम्ही औरंगाबादेत आक्रोश मोर्चा काढल्यामुळेच सरकार जागे झाले आणि मुख्यमंत्री औरंगाबादेत आले."

'सरकारला जागं करण्यासाठी मोर्चा'"धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती जालन्यामध्ये आहे. पैठनच्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असताना जालन्यात मात्र 15-15 दिवस पाणी येत नाही. सरकारला जागं करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलाय, जे सरकार सामान्य माणसांची दखल घेत नाही, ते जागेवर राहत नाह," अशी टीकाही फडणवीसांनी केली.

दानवेंची टीकायावेळी रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनीदेखील सरकारवर टीका केली. "जालन्याला आम्ही निधी दिला. आता राज्यात त्यांचे सरकार आहे, या निधीचा हिशोब राज्य सरकारने दिला पाहिजे? आमचे उत्तरदायित्व आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना पैसे दिले. आमचे मते चोरीला गेले. आम्ही येणाऱ्या निवडणुकीत यांना शिक्षा देऊ, असा इशारा दानवे यांनी शिवसेनेला दिला.

सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी

जालना शहरातील मामा चौकात बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. शिवसेनेच्या धनुष्याला लागलीय राष्ट्रवादीची दोरी, काँग्रेसवाले हसतात... होते आपल्या पाण्याची चोरी..., दे रे नगर परिषद पाणी दे, घानेवाडी उशाला- कोरड घशाला.. असे फलक हाती घेवून, डोक्यावर घागरी, मडके घेवून महिलाही या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. हलगी- डोल- ताशांच्या गजरात भाजपाचा जयघोष करताना महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी केली जात होती. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चास प्रारंभ झाला. मामा चौक ते सराफा बाजार, काद्राबाद, सुभाष चौक, मंमादेवी चौक मार्गे हा मोर्चा गांधीचमन येथे गेला. गांधीचमन येथे जाहीर सभेत या मोर्चाचे रूपांतर झाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalanaजालनाBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी