शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

"...तर ते सरकार जागेवर राहत नाही", जालन्यातून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 15:00 IST

पाणी प्रश्नावर औरंगाबादप्रमाणे जालन्यातही भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

जालना: पाणी प्रश्नावर काही दिवसांपूर्वी भाजपने औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चा काढला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या मोर्चाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर आता उद्योगनगरी असलेल्या जालना शहरातील पाणीप्रश्नासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रस्त्यावर उतरून जल आक्रोष मोर्चा काढला. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी सत्ताधारी सरकारवर सडकून टीका केली.

'आम्ही जालन्याला निधी दिला'"अडीच वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहात, 129 कोटी रुपयांचे काय केले? नाकर्तेपणामुळे पाणी देता येत नाही, तेच असे प्रश्न विचारात आहेत. पाणीप्रश्नावर भाजप काय उपाय करणार, सरकारकडे पैसे आहेत. रावसाहेब दानवे यांच्यामुळेच 129 कोटी रुपये जालन्याला मिळाले आहेत. आम्ही औरंगाबादेत आक्रोश मोर्चा काढल्यामुळेच सरकार जागे झाले आणि मुख्यमंत्री औरंगाबादेत आले."

'सरकारला जागं करण्यासाठी मोर्चा'"धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती जालन्यामध्ये आहे. पैठनच्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असताना जालन्यात मात्र 15-15 दिवस पाणी येत नाही. सरकारला जागं करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलाय, जे सरकार सामान्य माणसांची दखल घेत नाही, ते जागेवर राहत नाह," अशी टीकाही फडणवीसांनी केली.

दानवेंची टीकायावेळी रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनीदेखील सरकारवर टीका केली. "जालन्याला आम्ही निधी दिला. आता राज्यात त्यांचे सरकार आहे, या निधीचा हिशोब राज्य सरकारने दिला पाहिजे? आमचे उत्तरदायित्व आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना पैसे दिले. आमचे मते चोरीला गेले. आम्ही येणाऱ्या निवडणुकीत यांना शिक्षा देऊ, असा इशारा दानवे यांनी शिवसेनेला दिला.

सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी

जालना शहरातील मामा चौकात बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. शिवसेनेच्या धनुष्याला लागलीय राष्ट्रवादीची दोरी, काँग्रेसवाले हसतात... होते आपल्या पाण्याची चोरी..., दे रे नगर परिषद पाणी दे, घानेवाडी उशाला- कोरड घशाला.. असे फलक हाती घेवून, डोक्यावर घागरी, मडके घेवून महिलाही या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. हलगी- डोल- ताशांच्या गजरात भाजपाचा जयघोष करताना महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी केली जात होती. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चास प्रारंभ झाला. मामा चौक ते सराफा बाजार, काद्राबाद, सुभाष चौक, मंमादेवी चौक मार्गे हा मोर्चा गांधीचमन येथे गेला. गांधीचमन येथे जाहीर सभेत या मोर्चाचे रूपांतर झाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalanaजालनाBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी