शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

पोलिस भरती लेखी परीक्षेत मोठा घोटाळा; फेरपरीक्षा घेण्याची आमदार कैलास गोरंट्यालांची मागणी

By विजय मुंडे  | Updated: May 20, 2023 19:38 IST

मुंबई पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षेत गैरप्रकार झाला असून, आमच्यावर मोठा झाल्याची व्यथा जालना जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी व्यक्त केली

जालना : मुंबईत झालेल्या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. या घोटाळ्याची उच्चस्तरीय समिती मार्फत सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी फेर लेखी परीक्षा घ्यावी, अशी मागणीही आ. कैलास गोरंटयाल यांनी शनिवारी जालना येथे येथे बोलतांना केली.

मुंबई पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षेत गैरप्रकार झाला असून, आमच्यावर मोठा झाल्याची व्यथा जालना जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी आ.कैलास गोरंट्याल यांची भेट घेऊन मांडली. अंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृहात परीक्षार्थींनी शनिवारी दुपारी आ.गोरंटयाल यांची भेट घेवून झालेल्या अन्यायाचे कथन केले. अन्यायग्रस्त परीक्षार्थीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आ.कैलास गोरंट्याल यांनी उपस्थित अन्यायग्रस्त तरुण आणि तरुणींना धीर देत ते म्हणाले की, मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अन्य जिल्ह्यातील परीक्षार्थीवर देखील अन्याय झाला असेल अशी शंका आहे. लेखी परीक्षेच्यावेळी पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी गुगल सर्च करून बटण कॅमेऱ्याच्या माध्यमातून परीक्षेचा पेपर बाहेर पाठवून सार्वजनिक करत मायक्रोफोनद्वारे प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. यासाठी परीक्षार्थीकडून प्रत्येकी १० ते १२ लाख रुपयांची लाच घेण्यात आल्याचे अन्यायग्रस्त परीक्षार्थींनी सांगितल्याचे आ. गोरंटयाल म्हणाले. या प्रकरणी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याबरोबरच जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मुंबई पोलिस भरतीची लेखी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

धरणे आंदोलन करणारमुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेतील घोटाट्याची चौकशी करावी, अन्यायग्रस्तांवरील अन्याय दूर करावा, यासाठी आपण २२ मे रोजी सोमवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार, गणेश चांदोडे, गणेश दाभाडे, संतोष खरात यांच्यासह मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत अन्यायग्रस्त परीक्षार्थी उपस्थित हाेते.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिस