शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
2
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
3
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
4
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
5
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
6
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
7
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
8
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
9
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 
10
१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या
11
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
12
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
13
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
15
'या' आयपीओचं बंपर लिस्टिंग! पहिल्याच दिवशी ९ टक्क्यांचा नफा, गुंतवणूकदार मालामाल
16
Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
17
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
18
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
19
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
20
अ‍ॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अ‍ॅप! काय आहे कारण?

मोठी बातमी! मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून करणार बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 13:01 IST

मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा तीव्र चर्चा होण्याची चिन्हं आहेत.

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री बारा वाजेपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा आज सकाळी अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेतून केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून मराठ्यांना ओबीसीतून स्वतंत्र आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे. 

आज सकाळी पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. "आमचा नोंदीचा रेकॉर्ड कसा जळाला, त्याचा पंचनामा कुठेय?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही कोणताही ठोस परिणाम मिळाला नसल्याची टीका त्यांनी केली. हैदराबादमध्ये सापडलेले ८ हजार पुरावे कुठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटलं की, "फडणवीस तिहेरी पद्धतीने मराठा समाजाला संपवत आहेत."

"माझ्या उपोषणाकडे कुणी येवो अथवा न येवो, आता सरकारला कळेल उपोषण किती खतरनाक असतं," असं जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी राज्यातील जनतेला संयम राखण्याचं आवाहन केलं आणि कोणत्याही प्रकारचं आंदोलन न करण्याचं आवाहन केलं.

तुम्ही पक्षासाठी तर मी समाजासाठी बोलतोमनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या बार्शी येथील आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर देखील जहरी टीका केली. "मराठ्यांचं मतदान तुम्हाला निवडणुकीत मिळालं नाही, हे स्पष्ट करा," असा सवाल त्यांनी केला. तसेच त्यांनी म्हटलं, "माझं राजकारणात जाण्याचं कोणतंही स्वप्न नाही, मला फक्त माझ्या समाजाला न्याय मिळावा, एवढीच माझी मागणी आहे." आमदार राऊत यांना उद्देशून त्यांनी म्हणलं, "तुम्ही पक्षासाठी बोलता, मी समाजासाठी बोलतो. दुसऱ्यासाठी वेगळा आणि स्वतःसाठी वेगळा न्याय ही कोणती कामाची पद्धत आहे?" त्यांनी फडणवीस यांचं समर्थन करणाऱ्या आमदारांना देखील सावध राहण्याचा इशारा दिला. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की, "गरीब मराठ्यांमध्ये कधीही फूट पडत नाही, श्रीमंतीची फूट पहिल्यापासून आहे."

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना