शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मोठी बातमी! मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून करणार बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 13:01 IST

मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा तीव्र चर्चा होण्याची चिन्हं आहेत.

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री बारा वाजेपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा आज सकाळी अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेतून केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून मराठ्यांना ओबीसीतून स्वतंत्र आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे. 

आज सकाळी पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. "आमचा नोंदीचा रेकॉर्ड कसा जळाला, त्याचा पंचनामा कुठेय?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही कोणताही ठोस परिणाम मिळाला नसल्याची टीका त्यांनी केली. हैदराबादमध्ये सापडलेले ८ हजार पुरावे कुठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटलं की, "फडणवीस तिहेरी पद्धतीने मराठा समाजाला संपवत आहेत."

"माझ्या उपोषणाकडे कुणी येवो अथवा न येवो, आता सरकारला कळेल उपोषण किती खतरनाक असतं," असं जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी राज्यातील जनतेला संयम राखण्याचं आवाहन केलं आणि कोणत्याही प्रकारचं आंदोलन न करण्याचं आवाहन केलं.

तुम्ही पक्षासाठी तर मी समाजासाठी बोलतोमनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या बार्शी येथील आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर देखील जहरी टीका केली. "मराठ्यांचं मतदान तुम्हाला निवडणुकीत मिळालं नाही, हे स्पष्ट करा," असा सवाल त्यांनी केला. तसेच त्यांनी म्हटलं, "माझं राजकारणात जाण्याचं कोणतंही स्वप्न नाही, मला फक्त माझ्या समाजाला न्याय मिळावा, एवढीच माझी मागणी आहे." आमदार राऊत यांना उद्देशून त्यांनी म्हणलं, "तुम्ही पक्षासाठी बोलता, मी समाजासाठी बोलतो. दुसऱ्यासाठी वेगळा आणि स्वतःसाठी वेगळा न्याय ही कोणती कामाची पद्धत आहे?" त्यांनी फडणवीस यांचं समर्थन करणाऱ्या आमदारांना देखील सावध राहण्याचा इशारा दिला. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की, "गरीब मराठ्यांमध्ये कधीही फूट पडत नाही, श्रीमंतीची फूट पहिल्यापासून आहे."

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना