शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

समाजवादी समाज व्यवस्थेसाठी भगतसिंग अभ्यासण्याची गरज..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:16 IST

समाजवादी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी तरुणांनी भगतसिंग मुळातून अभ्यासावेत, आवाहन डॉ. मारोती तेगमपुरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भगतसिंगांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्यासाठी युवकांनी विवेकनिष्ठ होऊन समतेवर आधारलेला समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज देशातील वातावरण विवेकाला मारक आहे. असं म्हटलं जात की, ज्यांना चिकित्सा नको असते ते हळूहळू ज्ञानाचेच विरोधक होत जातात आणि ते नवनिर्मितीचेच शत्रू बनतात. या सर्व बाबींना छेद द्यायचा असेल तर भगतसिंग यांचे विचार आणि जीवन मुळातून समजून घेतले पाहिजे. समाजवादी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी तरुणांनी भगतसिंग मुळातून अभ्यासावेत, आवाहन डॉ. मारोती तेगमपुरे यांनी केले.जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शहीद भगतसिंग विचारमंच आयोजित शहीद भगतसिंग व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या वर्षीच्या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शहीद भगतसिंग अध्यासन केंद्राचे प्रा. सुधाकर शेंडगे यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबड येथील गोदावरी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांची उपस्थिती होती. मंचावर प्राचार्य डॉ सुनंदा तिडके, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, सय्यद शाकेर, अनुराधा हेरकर, सुनील रत्नपारखे यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना प्रा. सुधाकर शेंडगे म्हणाले, भगतसिंग यांच्या विचारांची आवश्यकता पाहण्याअगोदर भगतसिंग यांना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आज प्रत्येक महापुरुषांचे दैवीकरण करण्याचे काम सुरू असून, तरुण मात्र यामध्ये गुरफटत जात आहेत. आज देशातील तरुणांना ख-या अर्थाने भगतसिंगांच्या विचारांची गरज आहे. त्यांच्या विचारातूनच एक समाजवादी राष्ट्र आपण निर्माण करू असे प्रतिपादन प्रा. शेंडगे यांनी केले. अ‍ॅड. अनिल मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Bhagat SinghभगतसिंगSocialसामाजिक