शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

सावधान, कमी झोपेमुळे प्रतिकारशक्तीही खालावते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:32 IST

जालना : शास्त्रीयदृष्ट्या प्रत्येकाला किमान सहा ते आठ तासांची झोप आवश्यक आहे; परंतु आजच्या धकाधकीच्या आणि तणावाच्या वातावरणात एवढी ...

जालना : शास्त्रीयदृष्ट्या प्रत्येकाला किमान सहा ते आठ तासांची झोप आवश्यक आहे; परंतु आजच्या धकाधकीच्या आणि तणावाच्या वातावरणात एवढी झोप होणे शक्य नसल्याने अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तणावमुक्त राहून किमान आठ तास झोप मानवी शरीराला नवीन ऊर्जा निर्माण करून देते. यामुळे आरोग्यही चांगले राहते. लहान मुलांसाठी देखील झोपेच नियम आहेत.

किमान सहा तास झोप आवश्यक

प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या संस्था, शेतीत काम करीत असतो. श्रम झाल्यानंतर तेवढाच आराम देखील आवश्यक असतो. हा आराम खऱ्या अर्थाने गाढ झोपेतून मिळतो. त्यामुळे झोपेकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरू शकते.

रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीराची ढाल

चांगली झोप ही मानवी आरोग्यासाठी एक प्रकारची संजीवनी आहे. यामुळे झोपेपूर्वी तणावमुक्त होणे आवश्यक आहे. यातूनच तुम्हाला दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. झोप आणि तुमच्या आरोग्याचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. चांगल्या झोपेसाठी व्यायाम देखील गरजेचा असून, हल्ली याकडे दुर्लक्ष होत आहे.

अपुऱ्या झोपेचे तोटे

अपुऱ्या झोपेमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन प्रतिकारशक्ती कमी होते.

झोप व्यवस्थित न झाल्यास शरीरातील उष्णता वाढून रक्तदाब आणि अन्य आजार जडू शकतात.

व्यवस्थित झोप न झाल्यास त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामकाजावरही दिसून येतो.

संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक

चांगली झोप यावी म्हणून आहार आणि विहार या दोन्हीला तेवढेच महत्त्व आहे. आजची पिढी ही जंक फूड आणि हॉटेलमधील पदार्थ खाण्यास प्राधान्य देत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या झोपेवर होत असून, मोबाइलही याला कारणीभूत आहे.

किमान सहा तास झोप

चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने किमान सहा ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. ही झोप चांगली झाल्यानंतर तुमच्या शरीराला आराम मिळून तुमचे आरोग्य चांगले राहण्यासह आणि मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत हाेत असल्याचे दिसून येते.

- डॉ. संजय रुईखेडकर