शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या! २ मे पर्यंत उष्णतेचा अलर्ट; तापमान ४२ अंशांच्या पुढेच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 19:54 IST

तापमान झपाट्याने वाढत असल्यामुळे दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जालना : पाच दिवसांपासून जालना शहर परिसरात सूर्य आग ओकत आहे. आता पुन्हा बुधवारपासून तीन दिवस उष्णता वाढण्याचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. २ मेपर्यंत तापमान ४३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. मंगळवारी शहराचे तापमान ४२ अंश नोंदविले गेले आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्याच्या तापमानात सुमारे ४ ते ५ अंशांची वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. मागील आठवड्यात उष्णतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला होता. आता पुन्हा २९ ते २ मेपर्यंत उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. यामुळे पुढील तीन दिवस कमाल तापमान ४२ अंशाच्या वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

दिवसाचे तापमान मंगळवारी ४२ अंशांवर पाेहोचल्याचे दिसून आले. परिणामी, रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. तापमान झपाट्याने वाढत असल्यामुळे दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तापमान वाढत जाईल...पुढील काही दिवसांत तापमानाचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी.डॉ. प्रा. पंडित वासरे, हवामानशास्त्रज्ञ

काय काळजी घ्याल?हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३० एप्रिल ते २ मे दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत घर किंवा ऑफिसच्या बाहेर पडताना काळजी घ्यावी. उष्णतेमुळे तब्येत बिघडल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मोबाइलचा वापर कमी करावा; कारण मोबाइल फुटण्याची शक्यता असते. तसेच दही, ताक, सरबत इत्यादी थंड पेय पदार्थांचे सेवन करावे.

टॅग्स :JalanaजालनाHeat Strokeउष्माघात