शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

काळजी घ्या! २ मे पर्यंत उष्णतेचा अलर्ट; तापमान ४२ अंशांच्या पुढेच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 19:54 IST

तापमान झपाट्याने वाढत असल्यामुळे दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जालना : पाच दिवसांपासून जालना शहर परिसरात सूर्य आग ओकत आहे. आता पुन्हा बुधवारपासून तीन दिवस उष्णता वाढण्याचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. २ मेपर्यंत तापमान ४३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. मंगळवारी शहराचे तापमान ४२ अंश नोंदविले गेले आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्याच्या तापमानात सुमारे ४ ते ५ अंशांची वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. मागील आठवड्यात उष्णतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला होता. आता पुन्हा २९ ते २ मेपर्यंत उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. यामुळे पुढील तीन दिवस कमाल तापमान ४२ अंशाच्या वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

दिवसाचे तापमान मंगळवारी ४२ अंशांवर पाेहोचल्याचे दिसून आले. परिणामी, रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. तापमान झपाट्याने वाढत असल्यामुळे दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तापमान वाढत जाईल...पुढील काही दिवसांत तापमानाचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी.डॉ. प्रा. पंडित वासरे, हवामानशास्त्रज्ञ

काय काळजी घ्याल?हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३० एप्रिल ते २ मे दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत घर किंवा ऑफिसच्या बाहेर पडताना काळजी घ्यावी. उष्णतेमुळे तब्येत बिघडल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मोबाइलचा वापर कमी करावा; कारण मोबाइल फुटण्याची शक्यता असते. तसेच दही, ताक, सरबत इत्यादी थंड पेय पदार्थांचे सेवन करावे.

टॅग्स :JalanaजालनाHeat Strokeउष्माघात