शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

काळजी घ्या! २ मे पर्यंत उष्णतेचा अलर्ट; तापमान ४२ अंशांच्या पुढेच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 19:54 IST

तापमान झपाट्याने वाढत असल्यामुळे दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जालना : पाच दिवसांपासून जालना शहर परिसरात सूर्य आग ओकत आहे. आता पुन्हा बुधवारपासून तीन दिवस उष्णता वाढण्याचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. २ मेपर्यंत तापमान ४३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. मंगळवारी शहराचे तापमान ४२ अंश नोंदविले गेले आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्याच्या तापमानात सुमारे ४ ते ५ अंशांची वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. मागील आठवड्यात उष्णतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला होता. आता पुन्हा २९ ते २ मेपर्यंत उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. यामुळे पुढील तीन दिवस कमाल तापमान ४२ अंशाच्या वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

दिवसाचे तापमान मंगळवारी ४२ अंशांवर पाेहोचल्याचे दिसून आले. परिणामी, रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. तापमान झपाट्याने वाढत असल्यामुळे दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तापमान वाढत जाईल...पुढील काही दिवसांत तापमानाचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी.डॉ. प्रा. पंडित वासरे, हवामानशास्त्रज्ञ

काय काळजी घ्याल?हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३० एप्रिल ते २ मे दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत घर किंवा ऑफिसच्या बाहेर पडताना काळजी घ्यावी. उष्णतेमुळे तब्येत बिघडल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मोबाइलचा वापर कमी करावा; कारण मोबाइल फुटण्याची शक्यता असते. तसेच दही, ताक, सरबत इत्यादी थंड पेय पदार्थांचे सेवन करावे.

टॅग्स :JalanaजालनाHeat Strokeउष्माघात