शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महागाईच्या झटक्याने जालनेकर बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:38 IST

परभणी पाठोपाठ जालनेकरांनाही पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत असून, इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने जालनेकर चांगलेच धास्तावाले आहे

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परभणी पाठोपाठ जालनेकरांनाही पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत असून, इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने जालनेकर चांगलेच धास्तावाले आहे. त्यातच पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. असे चित्र असतांनाच नागरिकांना दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महागाईच्या झळा सर्वसामान्यांना चांगल्याच बसू लागल्या आहेत. यामध्येच परभणीनंतर जालन्यातही पेट्रोल व डिझेलच्या दरांने नव्वदी पार केली. त्यामुळे नागरिकांना आपला खिसा अधिकच खाली करावा लागत आहे. शनिवारी जालना शहरात ९१.६५ रुपयाने पेट्रोलची तर ७८.८८ रुपयांने डीझेलची विक्री झाली. मागील पंधरा ते वीस दिवसापासून पेट्रोल व डीझेलचे भाव १० ते २० पैसाने वाढत आहे.दररोज पेट्रोल व डीझेलचे भाव वाढत असून, याचा परिणाम, शहरातील वाहतुकीच्या दरांमध्ये होत आहे. यामुळे आॅटोचालकही भाव वाढ करण्याच्या विचारात आहेत. सध्या कैन्हयानगरकडे जाण्यासाठी १५ रुपयाचा दर ठेवण्यात आला आहे. शहरातील इतर ठिकाणी जाण्यासाठी दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. परंतु, येत्या काही दिवसात दर वाढु शकते. यानंतर आता बाजारातील भाजीपाल्यांचे दरही वाढण्याची शक्यता आहे.या भावाढीमुळे सामान्य नागरिक अडचणीत आले आहे. त्यातच जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरीही चिंतेत सापडला आहे.त्यामुळे केंद्र शासनाने इंधन दरवाढीवर आळा घालून इंधनाचे दर जीएसटीमध्ये आणावेत अशी मागणी नागरिक करीत आहे.भाजीपाल्याचे भावही गडगडलेएकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. सध्या टोमॅटो ५ रुपये किलो, मिरची २५ ते ३० रुपये किलो, फुल कोबी ३० ते ३५ रुपये किलो, आलु २० ते २५ किलो, कांदा १५ ते२० रुपये किलो, भेंडी २० ते २५ रुपये किलों विकली जात आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.

 

टॅग्स :Petrolपेट्रोलvegetableभाज्या