शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 01:09 IST

राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा मोठा परिणाम औद्योगिक आणि व्यापारी शहर असलेल्या जालन्यात जास्त दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा मोठा परिणाम औद्योगिक आणि व्यापारी शहर असलेल्या जालन्यात जास्त दिसून आला. दररोज काही कोटींची देवाण- घेवाण बँक व्यवहारातून होते. ती आता सलग तीन दिवस ठप्प होणार असल्याने रक्कम सांभाळण्याची मोठी जबाबदारी व्यापारी, उद्योजकांवर आली आहे.जालन्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या जवळपास १५ शाखा आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात तालुका आणि गाव पातळीवर मिळून ही संख्या ३४ च्या घरात पोहोचते. विशेष म्हणजे या राष्ट्रीयकृत बँकांच्या संपामुळे सहकारी बँकांचे व्यवहार सुरू असूनही त्याचा कुठलाच उपयोग झाला नाही. बँकेत रक्कम जमा करण्यापलीकडे सहकारी बँकेत कुठलेच व्यवहार झाले नाहीत.दररोज विविध उद्योजक, व्यापाऱ्यांचे लाखो रूपयांचे धनादेश हे सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा होतात. परंतु याचे क्लिअरिंग हाऊस अर्थात वटविण्याचे केंद्र हे एसबीआयमध्ये आहे. त्यातच ही बँकही संपात सहभागी होती. त्याचा मोठा परिणाम व्यवहारावर झाला आहे. सकाळी येथील शिवाजी पुतळा परिसरात पूर्वीची एसबीएच आणि आता बँक विलिनीकरणानंतरच्या एसबीआय बँकेसमोर बँक युनियनच्या पदाधिकारी तसेच सदस्यांनी जोरदार निदर्शने केली.मागणी : क्लिअरिंग हाऊस नियमित सुरूच ठेवण्याची गरजराष्ट्रीयीकृत बँक अधिकारी, कर्मचा-यांच्या मागण्या रास्त आहेत, त्याकडे सरकार पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राष्ट्रीयकृत बँकांचा संप होत आहे. असे असले तरी, किमान संप सुरू असताना क्लिअरिंग हाऊस असलेल्या बँकेत किमान दोन अधिका-यांची नियुक्ती करून हे काम सुरू ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा परिणाम सहकारी बँकांवर होणार नाही. आणि धनादेश वटण्यास अडचणी येत नाहीत, असे सहायक सरव्यवस्थापक शिरीष देवळे यांनी सांगितले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रStrikeसंपagitationआंदोलन