शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 01:09 IST

राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा मोठा परिणाम औद्योगिक आणि व्यापारी शहर असलेल्या जालन्यात जास्त दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा मोठा परिणाम औद्योगिक आणि व्यापारी शहर असलेल्या जालन्यात जास्त दिसून आला. दररोज काही कोटींची देवाण- घेवाण बँक व्यवहारातून होते. ती आता सलग तीन दिवस ठप्प होणार असल्याने रक्कम सांभाळण्याची मोठी जबाबदारी व्यापारी, उद्योजकांवर आली आहे.जालन्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या जवळपास १५ शाखा आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात तालुका आणि गाव पातळीवर मिळून ही संख्या ३४ च्या घरात पोहोचते. विशेष म्हणजे या राष्ट्रीयकृत बँकांच्या संपामुळे सहकारी बँकांचे व्यवहार सुरू असूनही त्याचा कुठलाच उपयोग झाला नाही. बँकेत रक्कम जमा करण्यापलीकडे सहकारी बँकेत कुठलेच व्यवहार झाले नाहीत.दररोज विविध उद्योजक, व्यापाऱ्यांचे लाखो रूपयांचे धनादेश हे सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा होतात. परंतु याचे क्लिअरिंग हाऊस अर्थात वटविण्याचे केंद्र हे एसबीआयमध्ये आहे. त्यातच ही बँकही संपात सहभागी होती. त्याचा मोठा परिणाम व्यवहारावर झाला आहे. सकाळी येथील शिवाजी पुतळा परिसरात पूर्वीची एसबीएच आणि आता बँक विलिनीकरणानंतरच्या एसबीआय बँकेसमोर बँक युनियनच्या पदाधिकारी तसेच सदस्यांनी जोरदार निदर्शने केली.मागणी : क्लिअरिंग हाऊस नियमित सुरूच ठेवण्याची गरजराष्ट्रीयीकृत बँक अधिकारी, कर्मचा-यांच्या मागण्या रास्त आहेत, त्याकडे सरकार पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राष्ट्रीयकृत बँकांचा संप होत आहे. असे असले तरी, किमान संप सुरू असताना क्लिअरिंग हाऊस असलेल्या बँकेत किमान दोन अधिका-यांची नियुक्ती करून हे काम सुरू ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा परिणाम सहकारी बँकांवर होणार नाही. आणि धनादेश वटण्यास अडचणी येत नाहीत, असे सहायक सरव्यवस्थापक शिरीष देवळे यांनी सांगितले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रStrikeसंपagitationआंदोलन