शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बाणेगाव प्रकल्प कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:12 IST

दुष्काळी परिस्थितीत तालुक्याची तहान भागविणारा बाणेगाव प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. तसेच पावसाअभावी गावा- गावात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाई : दुष्काळी परिस्थितीत प्रकल्पाने भागविली ५० गावांची तहान

भोकरदन : दुष्काळी परिस्थितीत तालुक्याची तहान भागविणारा बाणेगाव प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. तसेच पावसाअभावी गावा- गावात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे.भोकरदन तालुक्यात यंदा १९७२ पेक्षा महाभयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पिण्यासाठी पाणी कोठून आणावे असा प्रश्न प्रशासनाला पडला होता. तालुक्यातील सर्वच धरणे ८ ते ९ महिन्यांपूर्वीच कोरडे पडले होते. मात्र, भोकरदन- जालना रस्त्यावरील बाणेगाव मध्यम प्रकल्पात असलेल्या पाणी साठ्यामुळे भोकरदन शहरासह ५० गावांची तहान भागविण्याचे काम या धरणातुन टँकरद्वारे करण्यात आले होते.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे धरण सुध्दा कोरडे पडले होते. मात्र, त्यानंतर जुनच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यातील उत्तरभागात जोरदार पाऊस झाल्यामुळे दानापूर येथील जुई, शेलुद येथील धामणा व पदमावती येथील पद्मावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला होता. मात्र, ज्या धरणातुन दुष्काळी परिस्थीतीत पूर्ण तालुक्याची तहान भागविण्याचे काम करण्यात आले. त्या बाणेगाव धरणात या पावसाळ््यात साधा एक थेंब सुध्दा पाणी आले नाही. त्यामुळे धरणाच्या कार्यक्षेत्रातील जमिनीवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, या पीकाची लागवड केली आहे. तर भिंतीच्या जवळपास सर्वत्र हिरवळीने तलावर बहरल्याचे दिसत आहे़पुर्णा, गिरजा, केळना नद्या पाण्याविनातालुक्यातील प्रमुख मोठ्या नद्या असलेल्या पुर्णा, गिरजा, व केळना या नद्यांना या पावसाळ््यात केवळ एक- दोन पूर गेले आहेत. मात्र, दरवर्षी आॅगस्ट महिन्यात काळ्या पाण्याने या नद्याचे पात्र वाहत असते, यावर्षी या तिन्ही नद्याच्या पात्र ओसाड पडल्याचे दिसत आहे.एकाही नदीमध्ये पाणी वाहताना दिसत नाही. जर मोठा पाऊस झाला नाही तर अर्ध्या तालुक्यात गेल्या वर्षीसारखी भिषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तर जुई, धामणा व दक्षिण भागातील नदी नाल्यांना मात्र काळे पाणी वाहताना दिसत आहे़

टॅग्स :Jalanaजालनाdroughtदुष्काळwater shortageपाणीकपात