शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बाणेगाव प्रकल्प कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:12 IST

दुष्काळी परिस्थितीत तालुक्याची तहान भागविणारा बाणेगाव प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. तसेच पावसाअभावी गावा- गावात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाई : दुष्काळी परिस्थितीत प्रकल्पाने भागविली ५० गावांची तहान

भोकरदन : दुष्काळी परिस्थितीत तालुक्याची तहान भागविणारा बाणेगाव प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. तसेच पावसाअभावी गावा- गावात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे.भोकरदन तालुक्यात यंदा १९७२ पेक्षा महाभयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पिण्यासाठी पाणी कोठून आणावे असा प्रश्न प्रशासनाला पडला होता. तालुक्यातील सर्वच धरणे ८ ते ९ महिन्यांपूर्वीच कोरडे पडले होते. मात्र, भोकरदन- जालना रस्त्यावरील बाणेगाव मध्यम प्रकल्पात असलेल्या पाणी साठ्यामुळे भोकरदन शहरासह ५० गावांची तहान भागविण्याचे काम या धरणातुन टँकरद्वारे करण्यात आले होते.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे धरण सुध्दा कोरडे पडले होते. मात्र, त्यानंतर जुनच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यातील उत्तरभागात जोरदार पाऊस झाल्यामुळे दानापूर येथील जुई, शेलुद येथील धामणा व पदमावती येथील पद्मावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला होता. मात्र, ज्या धरणातुन दुष्काळी परिस्थीतीत पूर्ण तालुक्याची तहान भागविण्याचे काम करण्यात आले. त्या बाणेगाव धरणात या पावसाळ््यात साधा एक थेंब सुध्दा पाणी आले नाही. त्यामुळे धरणाच्या कार्यक्षेत्रातील जमिनीवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, या पीकाची लागवड केली आहे. तर भिंतीच्या जवळपास सर्वत्र हिरवळीने तलावर बहरल्याचे दिसत आहे़पुर्णा, गिरजा, केळना नद्या पाण्याविनातालुक्यातील प्रमुख मोठ्या नद्या असलेल्या पुर्णा, गिरजा, व केळना या नद्यांना या पावसाळ््यात केवळ एक- दोन पूर गेले आहेत. मात्र, दरवर्षी आॅगस्ट महिन्यात काळ्या पाण्याने या नद्याचे पात्र वाहत असते, यावर्षी या तिन्ही नद्याच्या पात्र ओसाड पडल्याचे दिसत आहे.एकाही नदीमध्ये पाणी वाहताना दिसत नाही. जर मोठा पाऊस झाला नाही तर अर्ध्या तालुक्यात गेल्या वर्षीसारखी भिषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तर जुई, धामणा व दक्षिण भागातील नदी नाल्यांना मात्र काळे पाणी वाहताना दिसत आहे़

टॅग्स :Jalanaजालनाdroughtदुष्काळwater shortageपाणीकपात