शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

बाणेगाव प्रकल्प कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:12 IST

दुष्काळी परिस्थितीत तालुक्याची तहान भागविणारा बाणेगाव प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. तसेच पावसाअभावी गावा- गावात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाई : दुष्काळी परिस्थितीत प्रकल्पाने भागविली ५० गावांची तहान

भोकरदन : दुष्काळी परिस्थितीत तालुक्याची तहान भागविणारा बाणेगाव प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. तसेच पावसाअभावी गावा- गावात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे.भोकरदन तालुक्यात यंदा १९७२ पेक्षा महाभयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पिण्यासाठी पाणी कोठून आणावे असा प्रश्न प्रशासनाला पडला होता. तालुक्यातील सर्वच धरणे ८ ते ९ महिन्यांपूर्वीच कोरडे पडले होते. मात्र, भोकरदन- जालना रस्त्यावरील बाणेगाव मध्यम प्रकल्पात असलेल्या पाणी साठ्यामुळे भोकरदन शहरासह ५० गावांची तहान भागविण्याचे काम या धरणातुन टँकरद्वारे करण्यात आले होते.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे धरण सुध्दा कोरडे पडले होते. मात्र, त्यानंतर जुनच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यातील उत्तरभागात जोरदार पाऊस झाल्यामुळे दानापूर येथील जुई, शेलुद येथील धामणा व पदमावती येथील पद्मावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला होता. मात्र, ज्या धरणातुन दुष्काळी परिस्थीतीत पूर्ण तालुक्याची तहान भागविण्याचे काम करण्यात आले. त्या बाणेगाव धरणात या पावसाळ््यात साधा एक थेंब सुध्दा पाणी आले नाही. त्यामुळे धरणाच्या कार्यक्षेत्रातील जमिनीवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, या पीकाची लागवड केली आहे. तर भिंतीच्या जवळपास सर्वत्र हिरवळीने तलावर बहरल्याचे दिसत आहे़पुर्णा, गिरजा, केळना नद्या पाण्याविनातालुक्यातील प्रमुख मोठ्या नद्या असलेल्या पुर्णा, गिरजा, व केळना या नद्यांना या पावसाळ््यात केवळ एक- दोन पूर गेले आहेत. मात्र, दरवर्षी आॅगस्ट महिन्यात काळ्या पाण्याने या नद्याचे पात्र वाहत असते, यावर्षी या तिन्ही नद्याच्या पात्र ओसाड पडल्याचे दिसत आहे.एकाही नदीमध्ये पाणी वाहताना दिसत नाही. जर मोठा पाऊस झाला नाही तर अर्ध्या तालुक्यात गेल्या वर्षीसारखी भिषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तर जुई, धामणा व दक्षिण भागातील नदी नाल्यांना मात्र काळे पाणी वाहताना दिसत आहे़

टॅग्स :Jalanaजालनाdroughtदुष्काळwater shortageपाणीकपात