शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

आॅटोमोबाईल मंदीचे जालन्यातही पडसाद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 01:02 IST

देशातील आॅटोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका वाहनांचा प्राण असलेल्या बेअरिंग्ज उत्पादन कंपनीला बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : देशातील आॅटोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका वाहनांचा प्राण असलेल्या बेअरिंग्ज उत्पादन कंपनीला बसला आहे. १९८२ पासून जालन्यात अविरत सुरू असलेली सर्वात मोठी कंपनी म्हणून एनआरबीची ओळख आहे. २००८ नंतर प्रथमच कंपनीने उत्पादन कपातीचा निर्णय घेतला आहे. महिन्यातील एक रविवार कंपनी बंद ठेवून कामगारांना वेतनासह सुटी देण्यात येणार आहे. सोमवारी कंपनीची साप्ताहिक सुटी असल्याने दोन दिवस कंपनी बंद ठेवण्यात येणार असल्याचे कामगार सूत्रांनी सांगितले.जालन्यातील या कंपनीत जवळपास एक हजारपेक्षा कायम कामगार तर जवळपास ३०० पेक्षा अधिक तात्पुरते कामगार अर्थात कॅज्युअल वर्कर यापूर्वीच कंपनीने कमी केल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. एनआरबी कंपनीत छोट्यात - छोट्या गाडीसह चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या बेअरिंग्जचे उत्पादन केले जाते. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आॅटोमोबाईल इंडस्ट्री अडचणीत होती.अनेक बड्या कार उत्पादक कंपन्यांनी उत्पादन घटविल्याने एनआरबीच्या बेअरिंग्जच्या मागणीत घट झाली. त्याचा परिणाम जालन्यातील या सर्वात मोठ्या कंपनीला मंदीची झळ पोहोचली.ही झळ लवकर भरून निघेल, अशी आशा व्यवस्थापनाला होती, परंतु मंदीचे वारे कमी होण्याची चिन्ह नसल्याने व्यवस्थापन आणि कामगारांनी एकत्रित बैठक घेऊन महिन्यात एका आणि वेळ पडल्यास दोन रविवार कंपनी पूर्णपणे बंदी ठेवून उत्पादन कमी करण्यात येणार आहे.साधारपणे २५ टक्के उत्पादन घटणार असल्याने याचा मोठा फटका उद्योगाला बसला आहे.विशेष म्हणजे रविवारी कंपनी बंद ठेवल्याने कंपनीचे वीजबिलासह अन्य नित्याच्या लागणाºया बाबी तसेच अन्य खर्चावर यामुळे नियंत्रण आणणे शक्य असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.आज जरी रविवारी कंपनी बंद ठेवण्यात येणार असली तरी भविष्यात ज्यावेळी मंदीचे मळभ दूर झाल्यावर रविवार हा सुटीचा दिवस नंतर अतिरिक्त काम करून ही तूट भरून काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले.एलजीबीतील संप : उद्योगविश्व चिंतेतजालन्यातील आॅटोमाबाईल क्षेत्राशी संबंधित एलजीबी ही उत्पादन वाहनांसाठीच्या चेनचे उत्पादन करते. गेल्या आठ दिवसांपासून या कंपनीत कामगार आणि व्यवस्थापनात झालेल्या किरकोळ वादातून संप सुरू आहे. या संपामुळे उद्योग विश्वासह कामगार विश्वात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यात व्यवस्थापन तसेच कामगारांनी देखील एक पाऊल मागे घेऊन संप मागे घ्यावा, यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु हा संप म्हणजे जालन्यातील उद्योगविश्वात चिंता निर्माण करणारा असल्याचा सूर ऐकण्यास मिळत आहे.

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगMarketबाजारLabourकामगारEconomyअर्थव्यवस्था