शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोमोबाईल मंदीचे जालन्यातही पडसाद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 01:02 IST

देशातील आॅटोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका वाहनांचा प्राण असलेल्या बेअरिंग्ज उत्पादन कंपनीला बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : देशातील आॅटोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका वाहनांचा प्राण असलेल्या बेअरिंग्ज उत्पादन कंपनीला बसला आहे. १९८२ पासून जालन्यात अविरत सुरू असलेली सर्वात मोठी कंपनी म्हणून एनआरबीची ओळख आहे. २००८ नंतर प्रथमच कंपनीने उत्पादन कपातीचा निर्णय घेतला आहे. महिन्यातील एक रविवार कंपनी बंद ठेवून कामगारांना वेतनासह सुटी देण्यात येणार आहे. सोमवारी कंपनीची साप्ताहिक सुटी असल्याने दोन दिवस कंपनी बंद ठेवण्यात येणार असल्याचे कामगार सूत्रांनी सांगितले.जालन्यातील या कंपनीत जवळपास एक हजारपेक्षा कायम कामगार तर जवळपास ३०० पेक्षा अधिक तात्पुरते कामगार अर्थात कॅज्युअल वर्कर यापूर्वीच कंपनीने कमी केल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. एनआरबी कंपनीत छोट्यात - छोट्या गाडीसह चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या बेअरिंग्जचे उत्पादन केले जाते. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आॅटोमोबाईल इंडस्ट्री अडचणीत होती.अनेक बड्या कार उत्पादक कंपन्यांनी उत्पादन घटविल्याने एनआरबीच्या बेअरिंग्जच्या मागणीत घट झाली. त्याचा परिणाम जालन्यातील या सर्वात मोठ्या कंपनीला मंदीची झळ पोहोचली.ही झळ लवकर भरून निघेल, अशी आशा व्यवस्थापनाला होती, परंतु मंदीचे वारे कमी होण्याची चिन्ह नसल्याने व्यवस्थापन आणि कामगारांनी एकत्रित बैठक घेऊन महिन्यात एका आणि वेळ पडल्यास दोन रविवार कंपनी पूर्णपणे बंदी ठेवून उत्पादन कमी करण्यात येणार आहे.साधारपणे २५ टक्के उत्पादन घटणार असल्याने याचा मोठा फटका उद्योगाला बसला आहे.विशेष म्हणजे रविवारी कंपनी बंद ठेवल्याने कंपनीचे वीजबिलासह अन्य नित्याच्या लागणाºया बाबी तसेच अन्य खर्चावर यामुळे नियंत्रण आणणे शक्य असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.आज जरी रविवारी कंपनी बंद ठेवण्यात येणार असली तरी भविष्यात ज्यावेळी मंदीचे मळभ दूर झाल्यावर रविवार हा सुटीचा दिवस नंतर अतिरिक्त काम करून ही तूट भरून काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले.एलजीबीतील संप : उद्योगविश्व चिंतेतजालन्यातील आॅटोमाबाईल क्षेत्राशी संबंधित एलजीबी ही उत्पादन वाहनांसाठीच्या चेनचे उत्पादन करते. गेल्या आठ दिवसांपासून या कंपनीत कामगार आणि व्यवस्थापनात झालेल्या किरकोळ वादातून संप सुरू आहे. या संपामुळे उद्योग विश्वासह कामगार विश्वात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यात व्यवस्थापन तसेच कामगारांनी देखील एक पाऊल मागे घेऊन संप मागे घ्यावा, यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु हा संप म्हणजे जालन्यातील उद्योगविश्वात चिंता निर्माण करणारा असल्याचा सूर ऐकण्यास मिळत आहे.

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगMarketबाजारLabourकामगारEconomyअर्थव्यवस्था