शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
4
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
5
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
6
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
7
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
8
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
9
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
10
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
11
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
12
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
13
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
14
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
15
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
16
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
17
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
18
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
19
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
20
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोमोबाईल मंदीचे जालन्यातही पडसाद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 01:02 IST

देशातील आॅटोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका वाहनांचा प्राण असलेल्या बेअरिंग्ज उत्पादन कंपनीला बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : देशातील आॅटोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका वाहनांचा प्राण असलेल्या बेअरिंग्ज उत्पादन कंपनीला बसला आहे. १९८२ पासून जालन्यात अविरत सुरू असलेली सर्वात मोठी कंपनी म्हणून एनआरबीची ओळख आहे. २००८ नंतर प्रथमच कंपनीने उत्पादन कपातीचा निर्णय घेतला आहे. महिन्यातील एक रविवार कंपनी बंद ठेवून कामगारांना वेतनासह सुटी देण्यात येणार आहे. सोमवारी कंपनीची साप्ताहिक सुटी असल्याने दोन दिवस कंपनी बंद ठेवण्यात येणार असल्याचे कामगार सूत्रांनी सांगितले.जालन्यातील या कंपनीत जवळपास एक हजारपेक्षा कायम कामगार तर जवळपास ३०० पेक्षा अधिक तात्पुरते कामगार अर्थात कॅज्युअल वर्कर यापूर्वीच कंपनीने कमी केल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. एनआरबी कंपनीत छोट्यात - छोट्या गाडीसह चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या बेअरिंग्जचे उत्पादन केले जाते. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आॅटोमोबाईल इंडस्ट्री अडचणीत होती.अनेक बड्या कार उत्पादक कंपन्यांनी उत्पादन घटविल्याने एनआरबीच्या बेअरिंग्जच्या मागणीत घट झाली. त्याचा परिणाम जालन्यातील या सर्वात मोठ्या कंपनीला मंदीची झळ पोहोचली.ही झळ लवकर भरून निघेल, अशी आशा व्यवस्थापनाला होती, परंतु मंदीचे वारे कमी होण्याची चिन्ह नसल्याने व्यवस्थापन आणि कामगारांनी एकत्रित बैठक घेऊन महिन्यात एका आणि वेळ पडल्यास दोन रविवार कंपनी पूर्णपणे बंदी ठेवून उत्पादन कमी करण्यात येणार आहे.साधारपणे २५ टक्के उत्पादन घटणार असल्याने याचा मोठा फटका उद्योगाला बसला आहे.विशेष म्हणजे रविवारी कंपनी बंद ठेवल्याने कंपनीचे वीजबिलासह अन्य नित्याच्या लागणाºया बाबी तसेच अन्य खर्चावर यामुळे नियंत्रण आणणे शक्य असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.आज जरी रविवारी कंपनी बंद ठेवण्यात येणार असली तरी भविष्यात ज्यावेळी मंदीचे मळभ दूर झाल्यावर रविवार हा सुटीचा दिवस नंतर अतिरिक्त काम करून ही तूट भरून काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले.एलजीबीतील संप : उद्योगविश्व चिंतेतजालन्यातील आॅटोमाबाईल क्षेत्राशी संबंधित एलजीबी ही उत्पादन वाहनांसाठीच्या चेनचे उत्पादन करते. गेल्या आठ दिवसांपासून या कंपनीत कामगार आणि व्यवस्थापनात झालेल्या किरकोळ वादातून संप सुरू आहे. या संपामुळे उद्योग विश्वासह कामगार विश्वात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यात व्यवस्थापन तसेच कामगारांनी देखील एक पाऊल मागे घेऊन संप मागे घ्यावा, यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु हा संप म्हणजे जालन्यातील उद्योगविश्वात चिंता निर्माण करणारा असल्याचा सूर ऐकण्यास मिळत आहे.

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगMarketबाजारLabourकामगारEconomyअर्थव्यवस्था