शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

राष्ट्रीयीकृत बँकांना ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST

जालना : पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँक अधिकाऱ्यांना फैलावर घेत पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ ऑगस्टचा ...

जालना : पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँक अधिकाऱ्यांना फैलावर घेत पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम दिला आहे. ज्या बँका पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा करतील त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव आता सहकार आयुक्त कार्यालयामार्फत रिझर्व्ह बँकेकडे देणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड यांनी दिला आहे.

पीककर्ज वाटपाबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँक अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. खरीप पीककर्ज वाटप हंगामातील चार महिने लोटले तरी शंभर टक्के लक्षांकाची पूर्तता झालेली नाही. ज्या बँका पीककर्ज वाटपात दिरंगाई करतील त्या बँकेतील सर्व शासकीय कार्यालयांची खाती, चालू खाती व इतर ठेवी अन्य बँकांमध्ये वळविण्याचा इशाराही राठोड यांनी यावेळी दिला. यावेळी विविध बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया जिल्हा समन्वयक गायबच

पीककर्ज वाटपाच्या बैठकीला हजर राहण्याबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जिल्हा समन्वयकांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत; परंतु ते जिल्हा समन्वयक दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्याच बैठकीला दांडी मारून गायब राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाजाचा अहवाल संबंधित बँकेच्या मुख्य कार्यालयास पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिल्या.

या बँकांची कामगिरी सुमार

जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या २० शाखा असतानाही केवळ २२ टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याशिवाय बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, एस.बी.आय., युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, एच.डी.एफ.सी. बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, इंडसइंड बँक, पंजाब नॅशनल बँकांनी लक्षांक पूर्ण केलेला नाही. या बँकांच्या सुमार कामगिरीवरही यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.

केवळ ४० टक्केच वाटप

चालू खरीप हंगामासाठी ११७९ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; परंतु आजवर केवळ ४६६ कोटी २२ लाख रुपये म्हणजे केवळ ४० टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले असून, याचा लाभ केवळ ९२ हजार ४९७ शेतकऱ्यांना मिळाला आहे. सर्वाधिक जिल्हा बँकेने ९५ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. तर इंडियन ओव्हर्सिस बँकेने ७० टक्के पीककर्ज वाटप केले आहे.