शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांना ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST

जालना : पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँक अधिकाऱ्यांना फैलावर घेत पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ ऑगस्टचा ...

जालना : पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँक अधिकाऱ्यांना फैलावर घेत पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम दिला आहे. ज्या बँका पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा करतील त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव आता सहकार आयुक्त कार्यालयामार्फत रिझर्व्ह बँकेकडे देणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड यांनी दिला आहे.

पीककर्ज वाटपाबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँक अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. खरीप पीककर्ज वाटप हंगामातील चार महिने लोटले तरी शंभर टक्के लक्षांकाची पूर्तता झालेली नाही. ज्या बँका पीककर्ज वाटपात दिरंगाई करतील त्या बँकेतील सर्व शासकीय कार्यालयांची खाती, चालू खाती व इतर ठेवी अन्य बँकांमध्ये वळविण्याचा इशाराही राठोड यांनी यावेळी दिला. यावेळी विविध बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया जिल्हा समन्वयक गायबच

पीककर्ज वाटपाच्या बैठकीला हजर राहण्याबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जिल्हा समन्वयकांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत; परंतु ते जिल्हा समन्वयक दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्याच बैठकीला दांडी मारून गायब राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाजाचा अहवाल संबंधित बँकेच्या मुख्य कार्यालयास पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिल्या.

या बँकांची कामगिरी सुमार

जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या २० शाखा असतानाही केवळ २२ टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याशिवाय बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, एस.बी.आय., युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, एच.डी.एफ.सी. बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, इंडसइंड बँक, पंजाब नॅशनल बँकांनी लक्षांक पूर्ण केलेला नाही. या बँकांच्या सुमार कामगिरीवरही यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.

केवळ ४० टक्केच वाटप

चालू खरीप हंगामासाठी ११७९ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; परंतु आजवर केवळ ४६६ कोटी २२ लाख रुपये म्हणजे केवळ ४० टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले असून, याचा लाभ केवळ ९२ हजार ४९७ शेतकऱ्यांना मिळाला आहे. सर्वाधिक जिल्हा बँकेने ९५ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. तर इंडियन ओव्हर्सिस बँकेने ७० टक्के पीककर्ज वाटप केले आहे.