शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांना ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST

जालना : पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँक अधिकाऱ्यांना फैलावर घेत पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ ऑगस्टचा ...

जालना : पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँक अधिकाऱ्यांना फैलावर घेत पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम दिला आहे. ज्या बँका पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा करतील त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव आता सहकार आयुक्त कार्यालयामार्फत रिझर्व्ह बँकेकडे देणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड यांनी दिला आहे.

पीककर्ज वाटपाबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँक अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. खरीप पीककर्ज वाटप हंगामातील चार महिने लोटले तरी शंभर टक्के लक्षांकाची पूर्तता झालेली नाही. ज्या बँका पीककर्ज वाटपात दिरंगाई करतील त्या बँकेतील सर्व शासकीय कार्यालयांची खाती, चालू खाती व इतर ठेवी अन्य बँकांमध्ये वळविण्याचा इशाराही राठोड यांनी यावेळी दिला. यावेळी विविध बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया जिल्हा समन्वयक गायबच

पीककर्ज वाटपाच्या बैठकीला हजर राहण्याबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जिल्हा समन्वयकांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत; परंतु ते जिल्हा समन्वयक दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्याच बैठकीला दांडी मारून गायब राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाजाचा अहवाल संबंधित बँकेच्या मुख्य कार्यालयास पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिल्या.

या बँकांची कामगिरी सुमार

जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या २० शाखा असतानाही केवळ २२ टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याशिवाय बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, एस.बी.आय., युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, एच.डी.एफ.सी. बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, इंडसइंड बँक, पंजाब नॅशनल बँकांनी लक्षांक पूर्ण केलेला नाही. या बँकांच्या सुमार कामगिरीवरही यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.

केवळ ४० टक्केच वाटप

चालू खरीप हंगामासाठी ११७९ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; परंतु आजवर केवळ ४६६ कोटी २२ लाख रुपये म्हणजे केवळ ४० टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले असून, याचा लाभ केवळ ९२ हजार ४९७ शेतकऱ्यांना मिळाला आहे. सर्वाधिक जिल्हा बँकेने ९५ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. तर इंडियन ओव्हर्सिस बँकेने ७० टक्के पीककर्ज वाटप केले आहे.