शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

'इंडिया नव्हे घमंडीया आघाडी'; रावसाहेब दानवेंची विरोधकांच्या आघाडीवर जोरदार टीका

By विजय मुंडे  | Updated: August 18, 2023 18:48 IST

मणिपूर मुद्दा केवळ राजकीय विरोधासाठीच पुढे करण्यात आल्याचीही टीका रावसाहेब दानवे यांनी केली 

जालना : संसदेच्या अधिवेशनात मणिपूर मुद्द्यावर पंतप्रधान उत्तर देत असताना विरोधकांनी वॉकआऊट केले. मणिपूरचा मुद्दा विरोधकांनी केवळ राजकीय विरोधासाठीच वापरला असून, ही इंडिया नव्हे तर घमंडीया आघाडी असल्याची टिका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. २०१४ पूर्वी जागतिक पातळीवर दहाव्या क्रमांकावर असलेली देशाची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील विकासाचा आलेख वाढत असून, जागतिक पातळीवरही भारताचा गौरव वाढल्याचे ते म्हणाले.

जालना येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २० जुलैला संसदेचे मान्सून सत्र सुरू झाले आणि ११ ऑगस्टला ते संपले. डिजिटल व्यक्तिगत डाटा संरक्षण, मध्यस्था विधेयक, तटीय जल कृषी प्राधिकरण, राष्ट्रीय नार्सिंग ऑफ मिड वायफारी २०२३ अशा विविध विधेयकांना मान्यता देण्यात आली. परंतु, संपूर्ण अधिवेशन कालावधीत विरोधकांनी केवळ मणिपूर परिस्थितीवर चर्चा करा, अशी मागणी लावून धरली. वेलमध्ये येणे, वॉक आऊट करणे, महत्त्वपूर्ण बिलांवर चर्चा न करणे यामुळे अनेकवेळा संसदेचे कामकाज तहकूब करावे लागले. इंडिया नव्हे घमंडीया आघाडीने संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर विषयावर उत्तर देत असताना विरोधकांनी वॉकआऊट केले. विरोधकांचा मणिपूर मुद्दा केवळ राजकीय विरोधासाठी होता. अविश्वास ठराव अवाजवी मताने फेटाळण्यात आल्याचेही दानवे म्हणाले.

पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर नाहीभाजप विरोधात झालेली इंडिया नव्हे घमंडीया आघाडी आहे. भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आश्वासक चेहरा आहे. परंतु, विरोधकांकडे आश्वासक चेहराच नाही. या आघाडीतून पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होताच त्या आघाडीतही फूट पडेल, असेही दानवे म्हणाले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालनाcongressकाँग्रेस