शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

'इंडिया नव्हे घमंडीया आघाडी'; रावसाहेब दानवेंची विरोधकांच्या आघाडीवर जोरदार टीका

By विजय मुंडे  | Updated: August 18, 2023 18:48 IST

मणिपूर मुद्दा केवळ राजकीय विरोधासाठीच पुढे करण्यात आल्याचीही टीका रावसाहेब दानवे यांनी केली 

जालना : संसदेच्या अधिवेशनात मणिपूर मुद्द्यावर पंतप्रधान उत्तर देत असताना विरोधकांनी वॉकआऊट केले. मणिपूरचा मुद्दा विरोधकांनी केवळ राजकीय विरोधासाठीच वापरला असून, ही इंडिया नव्हे तर घमंडीया आघाडी असल्याची टिका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. २०१४ पूर्वी जागतिक पातळीवर दहाव्या क्रमांकावर असलेली देशाची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील विकासाचा आलेख वाढत असून, जागतिक पातळीवरही भारताचा गौरव वाढल्याचे ते म्हणाले.

जालना येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २० जुलैला संसदेचे मान्सून सत्र सुरू झाले आणि ११ ऑगस्टला ते संपले. डिजिटल व्यक्तिगत डाटा संरक्षण, मध्यस्था विधेयक, तटीय जल कृषी प्राधिकरण, राष्ट्रीय नार्सिंग ऑफ मिड वायफारी २०२३ अशा विविध विधेयकांना मान्यता देण्यात आली. परंतु, संपूर्ण अधिवेशन कालावधीत विरोधकांनी केवळ मणिपूर परिस्थितीवर चर्चा करा, अशी मागणी लावून धरली. वेलमध्ये येणे, वॉक आऊट करणे, महत्त्वपूर्ण बिलांवर चर्चा न करणे यामुळे अनेकवेळा संसदेचे कामकाज तहकूब करावे लागले. इंडिया नव्हे घमंडीया आघाडीने संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर विषयावर उत्तर देत असताना विरोधकांनी वॉकआऊट केले. विरोधकांचा मणिपूर मुद्दा केवळ राजकीय विरोधासाठी होता. अविश्वास ठराव अवाजवी मताने फेटाळण्यात आल्याचेही दानवे म्हणाले.

पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर नाहीभाजप विरोधात झालेली इंडिया नव्हे घमंडीया आघाडी आहे. भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आश्वासक चेहरा आहे. परंतु, विरोधकांकडे आश्वासक चेहराच नाही. या आघाडीतून पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होताच त्या आघाडीतही फूट पडेल, असेही दानवे म्हणाले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालनाcongressकाँग्रेस