शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

'इंडिया नव्हे घमंडीया आघाडी'; रावसाहेब दानवेंची विरोधकांच्या आघाडीवर जोरदार टीका

By विजय मुंडे  | Updated: August 18, 2023 18:48 IST

मणिपूर मुद्दा केवळ राजकीय विरोधासाठीच पुढे करण्यात आल्याचीही टीका रावसाहेब दानवे यांनी केली 

जालना : संसदेच्या अधिवेशनात मणिपूर मुद्द्यावर पंतप्रधान उत्तर देत असताना विरोधकांनी वॉकआऊट केले. मणिपूरचा मुद्दा विरोधकांनी केवळ राजकीय विरोधासाठीच वापरला असून, ही इंडिया नव्हे तर घमंडीया आघाडी असल्याची टिका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. २०१४ पूर्वी जागतिक पातळीवर दहाव्या क्रमांकावर असलेली देशाची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील विकासाचा आलेख वाढत असून, जागतिक पातळीवरही भारताचा गौरव वाढल्याचे ते म्हणाले.

जालना येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २० जुलैला संसदेचे मान्सून सत्र सुरू झाले आणि ११ ऑगस्टला ते संपले. डिजिटल व्यक्तिगत डाटा संरक्षण, मध्यस्था विधेयक, तटीय जल कृषी प्राधिकरण, राष्ट्रीय नार्सिंग ऑफ मिड वायफारी २०२३ अशा विविध विधेयकांना मान्यता देण्यात आली. परंतु, संपूर्ण अधिवेशन कालावधीत विरोधकांनी केवळ मणिपूर परिस्थितीवर चर्चा करा, अशी मागणी लावून धरली. वेलमध्ये येणे, वॉक आऊट करणे, महत्त्वपूर्ण बिलांवर चर्चा न करणे यामुळे अनेकवेळा संसदेचे कामकाज तहकूब करावे लागले. इंडिया नव्हे घमंडीया आघाडीने संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर विषयावर उत्तर देत असताना विरोधकांनी वॉकआऊट केले. विरोधकांचा मणिपूर मुद्दा केवळ राजकीय विरोधासाठी होता. अविश्वास ठराव अवाजवी मताने फेटाळण्यात आल्याचेही दानवे म्हणाले.

पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर नाहीभाजप विरोधात झालेली इंडिया नव्हे घमंडीया आघाडी आहे. भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आश्वासक चेहरा आहे. परंतु, विरोधकांकडे आश्वासक चेहराच नाही. या आघाडीतून पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होताच त्या आघाडीतही फूट पडेल, असेही दानवे म्हणाले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालनाcongressकाँग्रेस