शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही; रावसाहेब दानवेंनी समेटानंतरही ऐकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 06:24 IST

खा. संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना दानवे म्हणाले, ईडी असो किंवा सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा असून, त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघ ९ वेळा झालेल्या निवडणुकांपैकी ५ वेळा भाजपने जिंकला आहे. ही जमीन ४५ वर्षांपासून आम्ही नांगरत असून, आता त्यात माल येत आहे. ती जमीन आता कुणालाही पाय ठेवायला देणार नाही. हा भाजपचा मतदारसंघ आहे. त्यामुळे अर्जुन खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही, असा स्पष्ट सल्ला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला, तसेच ईडीच्या कारवाईमुळे नाही, तर राजकीय सोयीमुळे खोतकरांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याचेही त्यांनी स्पष्ट  केले.

विभागीय आयुक्तालयात दानवे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, खोतकरांचे क्षेत्र वेगळे, माझे वेगळे आहे. मी लोकसभेचा तर ते विधानसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी विधानसभेवर दावा सांगावा. जालना लोकसभा मतदारसंघ दानवेच्या बापाची जहागिरी नाही. दानवे नसतील तर आ. हरिभाऊ बागडे किंवा अन्य कुणीही लढेल. भाजप हा मतदारसंघ सोडण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगून ते म्हणाले, शिवसेना सोडून शिंदेसेनेत का आले, याचे उत्तर खोतकरच देतील. 

भाजपवर आरोप म्हणजे कृत्यांवर पांघरूणखा. संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना दानवे म्हणाले, ईडी असो किंवा सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा असून, त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही. लालूप्रसाद यादव असतील, सुरेश कलमाडी यांच्यावर भाजपच्या काळात छापेमारी झाली नाही. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी यांचा सीबीआयने छळ केला, तो काय आमच्या काळात झाला नव्हता. ईडीच्या कारवायांमागे भाजप असल्याचा आरोप करणे म्हणजे केलेल्या कृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवे