शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही; रावसाहेब दानवेंनी समेटानंतरही ऐकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 06:24 IST

खा. संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना दानवे म्हणाले, ईडी असो किंवा सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा असून, त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघ ९ वेळा झालेल्या निवडणुकांपैकी ५ वेळा भाजपने जिंकला आहे. ही जमीन ४५ वर्षांपासून आम्ही नांगरत असून, आता त्यात माल येत आहे. ती जमीन आता कुणालाही पाय ठेवायला देणार नाही. हा भाजपचा मतदारसंघ आहे. त्यामुळे अर्जुन खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही, असा स्पष्ट सल्ला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला, तसेच ईडीच्या कारवाईमुळे नाही, तर राजकीय सोयीमुळे खोतकरांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याचेही त्यांनी स्पष्ट  केले.

विभागीय आयुक्तालयात दानवे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, खोतकरांचे क्षेत्र वेगळे, माझे वेगळे आहे. मी लोकसभेचा तर ते विधानसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी विधानसभेवर दावा सांगावा. जालना लोकसभा मतदारसंघ दानवेच्या बापाची जहागिरी नाही. दानवे नसतील तर आ. हरिभाऊ बागडे किंवा अन्य कुणीही लढेल. भाजप हा मतदारसंघ सोडण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगून ते म्हणाले, शिवसेना सोडून शिंदेसेनेत का आले, याचे उत्तर खोतकरच देतील. 

भाजपवर आरोप म्हणजे कृत्यांवर पांघरूणखा. संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना दानवे म्हणाले, ईडी असो किंवा सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा असून, त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही. लालूप्रसाद यादव असतील, सुरेश कलमाडी यांच्यावर भाजपच्या काळात छापेमारी झाली नाही. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी यांचा सीबीआयने छळ केला, तो काय आमच्या काळात झाला नव्हता. ईडीच्या कारवायांमागे भाजप असल्याचा आरोप करणे म्हणजे केलेल्या कृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवे