शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही; रावसाहेब दानवेंनी समेटानंतरही ऐकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 06:24 IST

खा. संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना दानवे म्हणाले, ईडी असो किंवा सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा असून, त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघ ९ वेळा झालेल्या निवडणुकांपैकी ५ वेळा भाजपने जिंकला आहे. ही जमीन ४५ वर्षांपासून आम्ही नांगरत असून, आता त्यात माल येत आहे. ती जमीन आता कुणालाही पाय ठेवायला देणार नाही. हा भाजपचा मतदारसंघ आहे. त्यामुळे अर्जुन खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही, असा स्पष्ट सल्ला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला, तसेच ईडीच्या कारवाईमुळे नाही, तर राजकीय सोयीमुळे खोतकरांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याचेही त्यांनी स्पष्ट  केले.

विभागीय आयुक्तालयात दानवे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, खोतकरांचे क्षेत्र वेगळे, माझे वेगळे आहे. मी लोकसभेचा तर ते विधानसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी विधानसभेवर दावा सांगावा. जालना लोकसभा मतदारसंघ दानवेच्या बापाची जहागिरी नाही. दानवे नसतील तर आ. हरिभाऊ बागडे किंवा अन्य कुणीही लढेल. भाजप हा मतदारसंघ सोडण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगून ते म्हणाले, शिवसेना सोडून शिंदेसेनेत का आले, याचे उत्तर खोतकरच देतील. 

भाजपवर आरोप म्हणजे कृत्यांवर पांघरूणखा. संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना दानवे म्हणाले, ईडी असो किंवा सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा असून, त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही. लालूप्रसाद यादव असतील, सुरेश कलमाडी यांच्यावर भाजपच्या काळात छापेमारी झाली नाही. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी यांचा सीबीआयने छळ केला, तो काय आमच्या काळात झाला नव्हता. ईडीच्या कारवायांमागे भाजप असल्याचा आरोप करणे म्हणजे केलेल्या कृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवे