शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का?; जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 19:55 IST

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा नेते प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर दिले.

 Manoj Jarange Patil ( Marathi News ) : "जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण  संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही", असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी एका कार्यक्रमात केले. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. भाजपा नेते प्रसाद लाड म्हणाले, मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना आरक्षणाबाबत विचारणार आहे का? महाविकास आघाडीचा बुरखा फाडणार आहात का? की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा बुरखा घालून राहुल गांधींची साथ देणार आहात, अशी टीका केली. दरम्यान, आता या टीकेली मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.    "आम्ही राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का? ते आमचे काम नाही, कुणाला काय कराचे, हे त्यांचे राजकीय स्टेटमेंट आहेत. त्याला आम्ही नाही बोलणार, आम्ही फक्त आरक्षणावर बोलणार.बाकीच्या गोष्टी आम्हाला सांगायच्या नाहीत. प्रसाद लाड यांच्यासारखी लोक देवेंद्र फडणवीस यांना वाचविणारी लोक आहेत. जात वाचविणारी लोक नाहीत, असा टोलाही मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. 

भ्रष्टाचार की महागाई म्हणावे...! ७ वर्षांपूर्वी ४२ कोटींना उड्डाणपूल बांधला, आता तोडायला ५२ कोटी खर्च

भाजपा आमदार राजेंद्र राऊत यांनी आज बार्शीत आंदोलन केले. या आंदोलनावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ते आंदोलन करुदेत, काय होतंय. ते चांगले काम करीत आहेत. एकदाच विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे. त्याशिवाय कोणता आमदार मराठ्यांच्या बाजूने बोलतो हे कळणार नाही. विरोधी पक्षाचे आमदार काय म्हणत आहेत. सत्ताधारी आमदार काय म्हणतात हे तर कळेल, असंही जरांगे पाटील म्हणाले. यावेळी पत्रकारांनी जरांगे पाटील यांनी तुमचीही विशेष अधिवेशनाची मागणी आहे का? असा सवाल केला. यावेळी पाटील म्हणाले, ती व्यक्तीही फडणवीस यांच्या सैन्यातील आहे. त्यामुळे ते काहीही मागणी करु शकतात. सत्ता टीकवण्यासाठी आणि पद टीकवण्यासाठी ते काहीही करु शकतात. शेवटी फडणवीस सांगतात तसेच त्यांना करावे लागणार आहे, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

मंत्र्यांना मोठं केले तेच आमदार आता समाजाविरोधात बोलत आहेत

"या लोकांचा दोष नाही, हे सगळं फडणवीस घडवून आणत आहेत. फडणवीस यांना कळत नाही की आपण किती संपवत आहे. जेवढी आमदार, मंत्री बोलतील तितका समाज त्यांच्यावर चिडेल. त्यांच्या पक्षातील मराठा समाजातही आता खदखद निर्माण झाली आहे. आपण मंत्र्यांना मोठं केले तेच आमदार आता समाजाविरोधात बोलत आहेत, असं त्यांना वाटेल, असंही पाटील म्हणाले. हे नेते स्वत:च पक्ष आणि संपत्ती वाचवण्यासाठी समाजाच्या विरोधात गेले आहेत. आमच्यासाठी कोणताही नेता मोठा नाही, आमच्यासाठी आरक्षण मोठं आहे. मराठ्यांना यांच्या तोंडून हे ऐकायचे होते. आरक्षणामुळे आमच्या समाजाचा फायदा होणार आहे, या नेत्यांना आता फडणवीस यांनी कामे दिली आहेत. यांना आता झोपू देणार नाहीत, संपत्ती वाचवण्यासाठी काहीही करतील. फडणवीस सत्तेचा गैरवापर करुन काम करत आहेत. आमचे ऐक नाहीतर तुला तुरुंगात टाकण्याची भिती घालतात, मलाही एसआयटी स्थापन करुन अशीच भिती घातलेली, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

'आरक्षण द्यावे लागणार'

"तुम्हाला आता आरक्षण द्यावेच लागणार आहे. त्याशिवाय मराठा मागे हटत नाही. आमचेच लोक आमच्याविरोधात घालून देवेंद्र फडणवीस फसत आहेत. तुम्ही आरक्षण द्या, तुम्ही आरक्षण न देता खड्डा भरुन काढू शकत नाही, तुम्हाला आरक्षण द्यावेच लागणार आहे, असंही पाटील म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणPrasad Ladप्रसाद लाडBJPभाजपा