शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ते दिल्ली विमान प्रवासाच्या आठवणींनी आजही मिळतो आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:54 IST

लोकमतच्या वतीने आयोजित संस्काराचे मोती उपक्रमातून विमान प्रवासाची पहिल्यांदाच संधी मिळाली. यामुळे देशाची राजधारी दिल्ली पाहण्याचा जो योग आला, त्यामुळे आपण समाधानी असल्याची भावूक प्रतिक्रिया ऋषिकेश विपुल भागवत या विद्यार्थ्याने व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकमतच्या वतीने आयोजित संस्काराचे मोती उपक्रमातून विमान प्रवासाची पहिल्यांदाच संधी मिळाली. यामुळे देशाची राजधारी दिल्ली पाहण्याचा जो योग आला, त्यामुळे आपण समाधानी आहोत, त्यातच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आम्हा मुलांना जे मोलाचे मार्गदर्शन केले, ते आजही स्मरणात असून, त्यानुसार पुढील वाटचाल करणार असल्याची भावूक प्रतिक्रिया ऋषिकेश विपुल भागवत या विद्यार्थ्याने व्यक्त केली.गेल्यावर्षी संस्काराचे मोती उपक्रमातून दिल्लीला विमानाने जाण्याची संधी मिळाली होती, यंदाही संस्काराचे मोती हा उपक्रम लोकमतने सुरू केल्याने मोठा आनंद होत असल्याचे ऋषिकेश म्हणाला. संस्काराचे मोती या सदरातून विद्यार्थ्यांसाठी जो खास उपक्रम सुरू केला आहे, त्यामुळे शालेय अभ्यासा सोबतच जगातील भोवतालचे परिपूर्ण ज्ञान मिळण्यास मोठी मदत होते. दिल्लीला आणि ते देखील विमानाने जाण्यासाठीच्या राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये माझा सहभाग राहिल्याने मनस्वी आनंद झाला होता.घरात सकाळी लोकमत आल्यावर तो प्रथम मी उचलून घेऊन संस्काराचे मोती हे पान उघडून वाचन करत असे. यंदाही तोच कित्ता आपण गिरवणार असल्याचे ऋषिकेशने सांगितले. दिल्लीत गेल्यावर तेथील लोकसभेची भव्य इमारत, इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, सरंक्षण मंत्रालय आदी ठिकाणांना आम्ही भेटी दिल्या. उपराष्ट्रपी व्यंकय्या नायडू यांनी आम्हा विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केले, ते अमूल्य होते. विद्यार्थ्यांनी घरात तसेच बाहेरच्या जगात वावरताना नेमके कसे वागले पाहिजे याचा मार्मिक पाठ त्यांनी शिकविला. त्यात आई-वडिल तसेच घरातील अन्य थोरांचा सन्मान करणे, संस्कारक्षम राहण्यासाठी नियमिती अभ्यासासह अन्य पुस्तकांचे वाचन करणे आदी संदर्भात मार्गदर्शन केले, ते आजही तेवढेच मनात घर करून असल्याचे पोदार इंग्रजी शाळेतील इयत्ता आठवित शिक्षण घेत असलेल्या ऋषिकेशने सांगितले.विमानात बसताना कुतूहल होते, मात्र नंतर आपण एवढ्या लहान वयात विमानात बसलो ते केवळ लोकमतच्या उपक्रमामुळे याची जाणीवही होती.आम्ही ज्यावेळी मुंबई ते दिल्ली आणि पुन्हा दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास केल्याचे मोठे अप्रूप आजही कायम आहे. त्यामुळे मुलांनी संस्काराचे मोती या उपक्रमात सहभागी होण्याचे विशेष आवाहनही ऋषिकेशने त्या अन्य विद्यार्थी मित्रांना या निमित्ताने केले.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटTravelप्रवास