शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मेहनत अन् नियोजनातून भावंडांची किमया, ३ एकर मिरचीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

By शिवाजी कदम | Updated: August 4, 2023 19:03 IST

नोकरीच्या मागे न पळता या युवकांनी आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित जमीन कसण्यास सुरुवात केली.

- गणेश पंडितकेदारखेडा : भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथील तरुण शेतकरी समाधान गाढे व अमोल गाढे या भावांनी तीन एकर शेतीमध्ये विविध जातींची मिरची लागवड केली आहे. त्यातून त्यांना साडेसात लाखांचे भरघोस उत्पादन मिळाले आहे. खर्च वजा करता सहा लाखांचा निव्वळ नफा त्यांना प्राप्त झाला आहे. आणखी दोन ते तीन लाखांच्या उत्पन्नाची त्यांना अपेक्षा आहे.

शेती हा नफ्याचा व्यवसाय नाही, ही संकल्पना मोडीत काढत बरंजळा साबळे येथील गाढे बंधूंनी शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. नोकरीच्या मागे न पळता या युवकांनी आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित जमीन कसण्यास सुरुवात केली. जिद्द मेहनतीची जोड देऊन मिरचीचे उत्पादन घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी तीन एकर शेतीत शिमलासह विविध प्रकारच्या मिरचीची लागवड केली. त्यातून त्यांना भरघोस उत्पादन मिळत आहे. 

समाधान गाढे यांनी पुणे विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. तसेच अमोल गाढे यांनी देखील पदवीधर आहेत. शिक्षण घेत असतानाच त्यांनी शेतीची कास धरून मिरची उत्पादन घेण्याकडे लक्ष केंद्रित केले. पिकांचे व्यवस्थित, निगा व योग्य नियोजन केल्याने चांगल्या उत्पन्नाची हमी मिळते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. सध्या त्यांनी मिरची तोडणीला सुरुवात केली असून, चार ते साडेचार हजारांचा भाव मिळत आहे. त्यांना साडेसात लाखांचे उत्पादन मिळाले असून, एक लाख पन्नास हजार रुपये खर्च लागलेला आहे. मिरची उत्पन्नातून गाढे बंधूंना सहा लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे.

मेहनत केल्यास यश नक्कीयुवकांना शेती करण्यात रस राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती तोट्यात असल्याचे सांगण्यात येते. नुकसान झाल्यास सरकारी मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, पिकांच्या योग्य नियोजनासह मेहनत केल्यास यश नक्कीच मिळते, हे गाढे बंधूंनी सिद्ध करून दाखवले आहे.

योग्य नियोजन आवश्यकआम्ही दोन्ही भाऊ वडिलोपार्जित शेती जिद्द व मेहनतीच्या जोरावर कसत आहोत. शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीच्या मागे न लागता नियोजनबद्ध शेती केल्याने चांगले उत्पन्न मिळत आहे. शेतीमध्ये मेहनत करण्याची तयारी असेल तर उत्पन्नाची हमी असतेच. तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज असल्याचे समाधान गाढे व अमोल गाढे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना