शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

मेहनत अन् नियोजनातून भावंडांची किमया, ३ एकर मिरचीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

By शिवाजी कदम | Updated: August 4, 2023 19:03 IST

नोकरीच्या मागे न पळता या युवकांनी आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित जमीन कसण्यास सुरुवात केली.

- गणेश पंडितकेदारखेडा : भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथील तरुण शेतकरी समाधान गाढे व अमोल गाढे या भावांनी तीन एकर शेतीमध्ये विविध जातींची मिरची लागवड केली आहे. त्यातून त्यांना साडेसात लाखांचे भरघोस उत्पादन मिळाले आहे. खर्च वजा करता सहा लाखांचा निव्वळ नफा त्यांना प्राप्त झाला आहे. आणखी दोन ते तीन लाखांच्या उत्पन्नाची त्यांना अपेक्षा आहे.

शेती हा नफ्याचा व्यवसाय नाही, ही संकल्पना मोडीत काढत बरंजळा साबळे येथील गाढे बंधूंनी शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. नोकरीच्या मागे न पळता या युवकांनी आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित जमीन कसण्यास सुरुवात केली. जिद्द मेहनतीची जोड देऊन मिरचीचे उत्पादन घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी तीन एकर शेतीत शिमलासह विविध प्रकारच्या मिरचीची लागवड केली. त्यातून त्यांना भरघोस उत्पादन मिळत आहे. 

समाधान गाढे यांनी पुणे विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. तसेच अमोल गाढे यांनी देखील पदवीधर आहेत. शिक्षण घेत असतानाच त्यांनी शेतीची कास धरून मिरची उत्पादन घेण्याकडे लक्ष केंद्रित केले. पिकांचे व्यवस्थित, निगा व योग्य नियोजन केल्याने चांगल्या उत्पन्नाची हमी मिळते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. सध्या त्यांनी मिरची तोडणीला सुरुवात केली असून, चार ते साडेचार हजारांचा भाव मिळत आहे. त्यांना साडेसात लाखांचे उत्पादन मिळाले असून, एक लाख पन्नास हजार रुपये खर्च लागलेला आहे. मिरची उत्पन्नातून गाढे बंधूंना सहा लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे.

मेहनत केल्यास यश नक्कीयुवकांना शेती करण्यात रस राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती तोट्यात असल्याचे सांगण्यात येते. नुकसान झाल्यास सरकारी मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, पिकांच्या योग्य नियोजनासह मेहनत केल्यास यश नक्कीच मिळते, हे गाढे बंधूंनी सिद्ध करून दाखवले आहे.

योग्य नियोजन आवश्यकआम्ही दोन्ही भाऊ वडिलोपार्जित शेती जिद्द व मेहनतीच्या जोरावर कसत आहोत. शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीच्या मागे न लागता नियोजनबद्ध शेती केल्याने चांगले उत्पन्न मिळत आहे. शेतीमध्ये मेहनत करण्याची तयारी असेल तर उत्पन्नाची हमी असतेच. तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज असल्याचे समाधान गाढे व अमोल गाढे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना