शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

रोहनवाडीनंतर आता सारवाडीत जलसंधारणाचा यज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:44 IST

जलसंधारणा सोबतच व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियानही येथे यशस्वीपणे राबविण्याची शपथ गावकऱ्यांनी यज्ञ सोहळ्यात घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील अरूणिमा फाऊंडेशने जालना तालुक्यातील रोहनवाडीत तीन वर्षे लोकसहभाग घेऊन जल क्रांती केली आहे. आता हीच लोकचळवळ रोहनवाडीच्या शेजारील सारवाडी गावात होणार असून, त्याचा श्रीगणेशा रविवारी २४ कुंडी गायत्री यज्ञाने झाला आहे. जलसंधारणा सोबतच व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियानही येथे यशस्वीपणे राबविण्याची शपथ गावकऱ्यांनी यज्ञ सोहळ्यात घेतली.अरूणिमा फाऊंडेशनचे संचालक रघुनंदन लाहोटी, कविता लाहोटी यांनी पुढाकार घेऊन रविवारी विरेश्वर उपाध्याय महाराज - हरिव्दार यांच्या प्रमुख उपस्थितीत सारवाडीत २४ कुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करून केली. सकाळी ८ वाजेपासूनच गावातील बहुतांश सर्व ग्रामस्थ या यज्ञ सोहळ्यात सपत्नीक सहभागी झाले होते. यज्ञ म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून, या यज्ञ सोहळ्यातून आपण आपल्या जीवनात कसे परिवर्तन आणू शकतो आणि यज्ञाच्या माध्यमातून केवळ यज्ञात आहुती टाकून मंत्रोच्चार करणे याला तर महत्त्व आहेच, परंतु हा यज्ञ करताना त्यांची सांगता ही चांगल्या कामांचा प्रारंभ करून ते यशस्वी करण्यासही यज्ञ असे संबोधले जाते असे स्पष्टीकरण विरेश्वर महाराजांनी एकेका श्लोकातून समजावून सांगितले.विश्वकल्याण आणि विश्वशांती तसेच जगातील सर्व मानवजातीचे कल्याण आणि उथ्थाला यज्ञातून प्राधान्य दिले जाते. वाईट बाबींचा त्याग करून नवीन आणि मानव कल्याणाच्या बाबींचा संकल्प म्हणजे यज्ञ असतो असेही यावेळी सांगण्यात आले.सकाळी ८ वाजेपासूनच सारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर २४ कुंड तयार करण्यात आले होते. गावातील प्रत्येक घरा समोर सडा-रांगोळी काढून स्वच्छतेला महत्व देऊन गावातील वातावरण प्रसन्न करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी शाळेतील मुले-मुली देखील यज्ञ सोहळ्यात हिरीरीने सहभागी झाल्याचे दिसून आले.विरेश्वर महाराज संस्कृतमधून यज्ञा संदर्भातील मंत्रोच्चार करत असताना कविता लाहोटी या त्याचे मराठीतून महत्त्व समजावून सांगत होत्या. त्यामुळे गावकºयांना आपण यज्ञ का करतो, हे समजण्यास मोठी मदत झाली.जलसंधारणासोबतच शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, महिलांचे सक्षमीकरणावरही यावेळी भर देण्यात येणार आहे. यावेळी प्रोफेसर काबरा, नम्रता काबरा, डॉ. महेंद्र काबरा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.रोहनवाडी येथील ग्रामस्थांनी आमच्या हाकेला सकारात्मक साथ देत गावाचा चेहरामोहरा बदला असून, तेथील ग्रामस्थांनी सेंद्रिय शेती, गोपालन करून स्वत:सह गावाचा विकास साधला आहे. त्यामुळे रोहनवाडी शिवारालगच असलेल्या सारवाडी येथेही असाच प्रयोग यशस्वी करण्यासाठी आमच्या फाऊंडेशनकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी रविवारी २४ कुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करून प्रथम गावकºयांमध्ये चेतना जागविण्याचे काम केले. पुढील वर्षभरात येथे शास्त्रीयदृष्ट्या जलसंधारणाचे काम हाती घेण्यात येणार असून, भूगर्भातील पाणी पातळीचा अभ्यास करून हे काम हाती घेण्यात येणार आहे.- रघुनंदन लाहोटी,अध्यक्ष, अरूणिमा फाऊंडेशन

टॅग्स :SocialसामाजिकIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प