शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

रोहनवाडीनंतर आता सारवाडीत जलसंधारणाचा यज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:44 IST

जलसंधारणा सोबतच व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियानही येथे यशस्वीपणे राबविण्याची शपथ गावकऱ्यांनी यज्ञ सोहळ्यात घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील अरूणिमा फाऊंडेशने जालना तालुक्यातील रोहनवाडीत तीन वर्षे लोकसहभाग घेऊन जल क्रांती केली आहे. आता हीच लोकचळवळ रोहनवाडीच्या शेजारील सारवाडी गावात होणार असून, त्याचा श्रीगणेशा रविवारी २४ कुंडी गायत्री यज्ञाने झाला आहे. जलसंधारणा सोबतच व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियानही येथे यशस्वीपणे राबविण्याची शपथ गावकऱ्यांनी यज्ञ सोहळ्यात घेतली.अरूणिमा फाऊंडेशनचे संचालक रघुनंदन लाहोटी, कविता लाहोटी यांनी पुढाकार घेऊन रविवारी विरेश्वर उपाध्याय महाराज - हरिव्दार यांच्या प्रमुख उपस्थितीत सारवाडीत २४ कुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करून केली. सकाळी ८ वाजेपासूनच गावातील बहुतांश सर्व ग्रामस्थ या यज्ञ सोहळ्यात सपत्नीक सहभागी झाले होते. यज्ञ म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून, या यज्ञ सोहळ्यातून आपण आपल्या जीवनात कसे परिवर्तन आणू शकतो आणि यज्ञाच्या माध्यमातून केवळ यज्ञात आहुती टाकून मंत्रोच्चार करणे याला तर महत्त्व आहेच, परंतु हा यज्ञ करताना त्यांची सांगता ही चांगल्या कामांचा प्रारंभ करून ते यशस्वी करण्यासही यज्ञ असे संबोधले जाते असे स्पष्टीकरण विरेश्वर महाराजांनी एकेका श्लोकातून समजावून सांगितले.विश्वकल्याण आणि विश्वशांती तसेच जगातील सर्व मानवजातीचे कल्याण आणि उथ्थाला यज्ञातून प्राधान्य दिले जाते. वाईट बाबींचा त्याग करून नवीन आणि मानव कल्याणाच्या बाबींचा संकल्प म्हणजे यज्ञ असतो असेही यावेळी सांगण्यात आले.सकाळी ८ वाजेपासूनच सारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर २४ कुंड तयार करण्यात आले होते. गावातील प्रत्येक घरा समोर सडा-रांगोळी काढून स्वच्छतेला महत्व देऊन गावातील वातावरण प्रसन्न करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी शाळेतील मुले-मुली देखील यज्ञ सोहळ्यात हिरीरीने सहभागी झाल्याचे दिसून आले.विरेश्वर महाराज संस्कृतमधून यज्ञा संदर्भातील मंत्रोच्चार करत असताना कविता लाहोटी या त्याचे मराठीतून महत्त्व समजावून सांगत होत्या. त्यामुळे गावकºयांना आपण यज्ञ का करतो, हे समजण्यास मोठी मदत झाली.जलसंधारणासोबतच शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, महिलांचे सक्षमीकरणावरही यावेळी भर देण्यात येणार आहे. यावेळी प्रोफेसर काबरा, नम्रता काबरा, डॉ. महेंद्र काबरा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.रोहनवाडी येथील ग्रामस्थांनी आमच्या हाकेला सकारात्मक साथ देत गावाचा चेहरामोहरा बदला असून, तेथील ग्रामस्थांनी सेंद्रिय शेती, गोपालन करून स्वत:सह गावाचा विकास साधला आहे. त्यामुळे रोहनवाडी शिवारालगच असलेल्या सारवाडी येथेही असाच प्रयोग यशस्वी करण्यासाठी आमच्या फाऊंडेशनकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी रविवारी २४ कुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करून प्रथम गावकºयांमध्ये चेतना जागविण्याचे काम केले. पुढील वर्षभरात येथे शास्त्रीयदृष्ट्या जलसंधारणाचे काम हाती घेण्यात येणार असून, भूगर्भातील पाणी पातळीचा अभ्यास करून हे काम हाती घेण्यात येणार आहे.- रघुनंदन लाहोटी,अध्यक्ष, अरूणिमा फाऊंडेशन

टॅग्स :SocialसामाजिकIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प