शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

'नोकरीस रुजू होऊन बहिणीच्या लग्नाला येतो'; फोननंतर इंजिनीअरचा ३ दिवसांनी मृतदेहच सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 18:13 IST

२८ फेब्रुवारी रोजी कॅम्पस निवडीमधून मिळालेल्या नोकरीस रुजू होऊन बहिणीच्या विवाहासाठी गावी जाणार होता.

भोकरदन ( जालना ) : नाशिकयेथून २६ फेब्रुवारीपासून गायब असलेला तालुक्यातील कोठी तांदुळवाडी येथील तरुण अभियंता अभिषेक कैलास खरात (२२) याचा आज दुपारी गंगापूर धरणाच्या सय्यदपिंप्री परिसरातील कॅनालमध्ये मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, २८ फेब्रुवारी रोजी कॅम्पस निवडीमधून मिळालेल्या नोकरीस अभिषेक रुजू होऊन बहिणीच्या विवाहासाठी गावी जाणार होता. त्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खरात परिवार आणि कोठी तांदुळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. 

कोठी तांदुळवाडी येथील कैलास खरात यांचा एकुलता एक मुलगा अभिषेक नाशिक येथील केके वाघ इंजिनिरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असे. नुकतेच त्याचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले होते. तसेच कॅम्पस मुलाखतीत त्याला नोकरीसुद्धा मिळाली होती. मुलास नोकरी लागल्याने खरात कुटुंबासह सर्व गावकरी आनंदी होते. चुलत बहिणीचे ९ मार्च रोजी लग्न होते त्यामुळे २८ तारखेस नोकरीस रुजू होऊन गावी येणार असल्याचे अभिषेकने घरी सांगितले होते. 

दरम्यान, २६ फेब्रुवारीस रात्री १० वाजेच्या दरम्यान एका हॉटेलमधून जेवण्यास गेला होता. त्यानंतर तो वसतिगृहावर परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी अभिषेकच्या मित्रांनी त्याच्या आईवडिलांना तो हॉस्टेलवर आला नसल्याची माहिती दिली. यानंतर अभिषेकचे वडील, काका व इतर नातेवाईकांनी नाशिक गाठून शोध सुरु केला. मात्र, अभिषेकचा शोध लागला नाही.

केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील अभिषेकच्या तपासाबद्दल पोलिसांना सूचना दिल्या. अभिषेक कुठल्याच सीसीटीव्हीमध्ये आढळून न आल्याने पोलिसांनी वेगळ्या बाजूने तपास सुरु केला. अभिषेकच्या हॉस्टेलच्या बाजूने गेलेल्या गंगापूर धरणाच्या कॅनालमध्ये त्याचा शोध घेण्यात आला. तब्बल तीन दिवसांनी आज दुपारी सय्यद पिंप्री परिसरातील कॅनालमध्ये अभिषेकचा मृतदेह आढळून आला. 

बहिणीचे लग्न पुढे ढकलले

अभिषेक गायब झाल्याची माहिती मिळाल्यापासून त्याचा आईने जेवण बंद केले आहे. आज त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्यासह कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. होतकरू आणि तरुण अभियंत्याच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. आज सायंकाळी गावात अभिषेकवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, ९ मार्च रोजी होणारा अभिषेकच्या बहिणीचा विवाह देखील पुढे ढकलण्यात आला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी