शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

२८ वर्षानंतरही शालेय मुलींना एक रूपया भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 1:02 AM

गरीब, सर्वसामान्य विद्यार्थिनींना मागील २८ वर्षांपासून केवळ एक रूपया उपस्थिती भत्ता मिळत आहे.

सय्यद इरफान ।लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : गरीब, सर्वसामान्य विद्यार्थिनींना मागील २८ वर्षांपासून केवळ एक रूपया उपस्थिती भत्ता मिळत आहे. या तुटपुंज्या भत्त्यात वाढ करण्याकडे मात्र शिक्षण विभागासह शासनाचे दुर्लक्ष होत आहे.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. मुलींना शिक्षणाची दारे खुली करून क्रांती घडविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कालावधीतच उपस्थिती भत्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने ३ जानेवारी १९९२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी विद्यार्थिनींसाठी उपस्थिती भत्ता योजना सुरू केली.प्राथमिक शाळेतील मुलींची उपस्थिती वाढावी म्हणून पहिली ते चौथीमधील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदेमार्फत चालविल्या जाणा-या शाळांमधील आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जाती आणि विमुक्त जमातीमधील विद्यार्थिनींना एक रूपया उपस्थिती भत्ता देण्यात येतो. पूर्वी ग्रामीण भागात मुलीच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण फार कमी होते. पालकांचाही मुलींना शिकविण्याकडे कल कमी होता. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने मुलींसाठी उपस्थिती भत्ता योजना सुरू केली. यासाठी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थितीची अट लागू करण्यात आली. शैक्षणिक वर्षासाठी दर दिवसाला एक रुपयाप्रमाणे २२० रूपयापर्यंत उपस्थिती भत्ता दिला जातो. योजनेला २८ वर्षे उलटली आहेत. मात्र, एकीकडे वेतन आयोग लागू होत असताना दुसरीकडे मात्र, विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यात छदामही वाढ करण्यात आलेली नाही.वेतन आयोग लागू व्हावा, पेन्शन योजना सुरू व्हावी, यासाठी आवाज उठविणाºया शिक्षक संघटनांनी गरीब विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यात वाढ व्हावी, यासाठी आवाज उठविण्याची गरज आहे.जिल्ह्यात अनेक संघटना आहेत. या संघटनांनी एकत्रित येऊन लढा उभा करावा, शासनाला मुलींचा भत्ता वाढविण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी  नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुले