शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आदर्श शिंदेनी जिंकली मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:39 IST

जालन्यात तीन दिवसीय भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या फेस्टिव्हलची सांगता प्रसिध्द गायक आदर्श शिंदेच्या बहारदार भीम गीतांनी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या पुढाकाराने तीन दिवसीय भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या फेस्टिव्हलची सांगता प्रसिध्द गायक आदर्श शिंदेच्या बहारदार भीम गीतांनी झाली. यावेळी आदर्श शिंदेंची व्यासपीठावर उपस्थिती होताच, त्यांचे टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत जालनेकर रसिकांनी केले.प्रारंभी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आदर्श शिंदेचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अ‍ॅड. बी.एम. साळवे, सुधाकर निकाळजे, एन.डी. गायकवाड, बबनराव रत्नपारखे, गणेश रत्नपारखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी सोनियाची उगवली सकाळ...जन्मास आले भीमराव, विज्ञानाचा निर्मळ झरा.. भीमा सारखा माणूस खरा.. जन्मा येईल काय, माझ्या भीमरायावाणी सांगा पुढारी होईल का, यासह अन्य भीम गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थित रसिकांनी शिंदेंच्या गायकीला टाळ्यांचा तेवढाच प्रतिसाद देत त्यांचा उत्साह वाढविला. अनेक गाण्यांना वन्समोअर करण्यात आल्याने अंबड चौफुलीचा परिसर भीम गीतांनी न्हाऊन निघाला. हा भीम महोत्सव आम्ही दरवर्षी भरवू, अशी घोषणा यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. तसेच तीन दिवसांच्या या भीम महोत्सवात झालेल्या कार्यक्रमांना रसिकांनी जो प्रतिसाद दिला, तो प्रेरणादायी होता.

टॅग्स :Socialसामाजिकcultureसांस्कृतिकmusicसंगीत