शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वीजचोरांना दणका! जालन्यात आठ महिन्यांत ५२२ जणांवर गुन्हे दाखल

By दिपक ढोले  | Updated: December 9, 2023 15:11 IST

ज्या विद्युत वाहिनीवर वीजगळतीचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात इतर भागातील कर्मचाऱ्यांनीही भाग घेऊन एकाचवेळी कारवाई करण्याचे निर्देश

जालना : वीजचोरीविरोधात जिल्ह्यात महावितरणने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या आठ महिन्यांत आकडे टाकून तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या तब्बल ५२२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी परिमंडलातील छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन्ही जिल्ह्यांत वीजचोरीविरोधात नियमित कारवायांबरोबरच प्रत्येक महिन्यात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय अभियंते व कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. ज्या विद्युत वाहिनीवर वीजगळतीचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात इतर भागातील कर्मचाऱ्यांनीही भाग घेऊन एकाचवेळी कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यानुसार परिमंडलातील प्रत्येक शाखेत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सलग काही दिवस केवळ वीजचोरीविरोधातील धडक मोहीम राबवण्यात येते. जालना जिल्ह्यातही मुख्य अभियंता डॉ. केळे यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या मोहिमांत वीजचोरांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत जालना जिल्ह्यात तब्बल ५२२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या वीजचोरांनी ३ लाख ८७ हजार ३७६ युनिट विजेची चोरी केली आहे, ज्याची रक्कम ७१ लाख ५६ हजार ४९५ रुपये एवढी आहे. जालना शहर उपविभागात ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ९ लाख ७१ हजार १६५ रुपयांची ५३४०६ युनिट वीजचोरी केली. जालना ग्रामीण उपविभागात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ९५ हजार २५० रुपयांची ४०९४ युनिट वीजचोरी केली. भोकरदन उपविभागात ४७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ५ लाख ९६ हजार ४७२ रुपयांची ३७९१४ युनिट वीजचोरी केली. जाफराबाद उपविभागात ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ६३ हजार ७१३ रुपयांची ५३११ युनिट वीजचोरी केली. अंबड उपविभागात १२२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी १४ लाख ३१ हजार ९४८ रुपयांची ८२५२९ युनिट वीजचोरी केली. घनसावंगी उपविभागात ९९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी १५ लाख ५ हजार ५३८ रुपयांची ७६१८२ युनिट वीजचोरी केली. मंठा उपविभागात ९५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ९ लाख ९० हजार ७३० रुपयांची ४१८४१ युनिट वीजचोरी केली. परतूर उपविभागात ९९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी १५ लाख १ हजार ६७९ रुपयांची ८६०९९ युनिट वीजचोरी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना