शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

'समृध्दी'वर सलग दुसऱ्या दिवशी अपघात; भरधाव कार उभ्या कंटेनरवर धडकली, तरूणी ठार

By दिपक ढोले  | Updated: June 10, 2023 12:02 IST

शुक्रवारी दुपारी समृध्दी महामार्गावर एका कारने उभा असलेल्या कंटेनरला धडक दिली. यात मायलेकीसह अन्य एकजण ठार झाला होता.

जालना : समृध्दी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून, शनिवारी सकाळीच भरधाव कारने उभा असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने एक तरूणी जागीच ठार झाली आहे. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात समृध्दी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३५७ वर घडला.

नागपूर येथील रहिवासी अंशुल टाकळीकर (२५) आणि तरुणी ओइंद्रआर रॉय (२६) हे दोघे एकाच कंपनीत काम करतात. ओइंद्रआर रॉय ही बंगळूर येथून नागपूरला आली होती. नागपूरहून अंशुल व ओइंद्रआर हे दोघे फिरण्यासाठी पुण्याला गेले होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोघेही जण कार क्रमांक (एम.एच.४९बीडब्ल्यू ०११७)ने नागपूरकडे निघाले होते. शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास समृध्दी महामार्गाने जात असतांना जालना जिल्ह्याच्या हद्दीतील चॅनल क्रमांक ३५७ वर भरधाव कार उभा असलेल्या कंटेनर क्रमांक (एमएच.३४.बीजी.६७३५) ला पाठीमागून धडकली. यात ओइंद्रआर रॉय ही तरूणी जागीच ठार झाली. तर अंशुल टाकळीकर (रा. नागपूर) हा जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जालना येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. क्रेनच्या साह्यायाने कार व कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्यात आळे. यावेळी महामार्गाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पना राठोड, पोलिस कर्मचारी चाटे, बिजुले, बेडेकर आणि हावळे यांची उपस्थिती होती. दरम्यान, घटनास्थळावरून कंटेनर चालक फरार झाला आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

सलग दुसऱ्या दिवशी अपघातशुक्रवारी दुपारी समृध्दी महामार्गावर एका कारने उभा असलेल्या कंटेनरला धडक दिली. यात मायलेकीसह अन्य एकजण ठार झाला होता. तर एकजण गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर शनिवारी सकाळीच महामार्गावर आणखी एक अपघात झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालनाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग