शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

वाहनांची गती वाढल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:51 IST

वाटूर - परतूर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण होऊ लागल्याने वाहनांच्या गतीत वाढ झाली आहे. पण, अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : वाटूर - परतूर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण होऊ लागल्याने वाहनांच्या गतीत वाढ झाली आहे. पण, अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.वाटूर- परतूर रस्त्याचे सिंमेंट काँक्रीटीकरण मागील वर्षीपासून सुरू आहे. म्हणजेच दिंडी मार्ग या रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदारांकडून वाहतूकीची काहीच काळजी घेतली जात नाही. कूठेही मटेरीयल टाकून, खोदकाम, खड्डे, दगड, खडी मनमानी पणे टाकण्यात येत आहे. यातच पाणी न मारल्याने धुळीचाही त्रास वर्षभरापासून सुरू आहे. परतूर- वाटूर दरम्यान ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण होऊन या रस्त्यावर वाहतूक सुरू झाली असून वाहनांची गती वाढली आहे. रस्त्यावरून वाहने भरधाव वेगाने धावू लागली आहेत. पण, वेगाने आलेले वाहनाला बाजू घेता येत नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याने आतापर्यंत दोन- तीन बळी घेतले आहेत, यामुळे अर्धवट कामाजवळ काही संकेत, खुणा करणे आवश्यक आहे.तसेच रस्त्यावर तात्पुरते गतिरोधक उभारण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे..या रस्त्यावर वाळूचे ट्रॅक्टरही भरधाव वेगाने धावत आहेत. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी खाली गेल्याने मोठ्या प्रमाणात वाळू पट्टे उघडे पडत आहेत. रात्री या पट्ट्यातून अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर या रस्त्याने भरधाव धावत आहेत. यातील विशेष म्हणजे, या ट्रॅक्टर व ट्रालीला क्रमांकही नसतो. त्यामुळे अपघात झाल्यास हे ट्रॅक्टर चालक पळून जातात. यामुळे ट्रॅक्टरला आळा घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघात