शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अ.भा. महानुभाव साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:53 IST

अखिल भारतीय महानुभाव सािहत्य मंडळाच्यावतीने जालन्यात २३ आणि २४ डिसेंबर दरम्यान १२ वे साहित्य संमेलन होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अखिल भारतीय महानुभाव सािहत्य मंडळाच्यावतीने जालन्यात २३ आणि २४ डिसेंबर दरम्यान १२ वे साहित्य संमेलन होणार असून, याचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते रविवारी दुपारी एक वाजता होणार असल्याची माहिती महंत प्रज्ञासागर महाराज आणि स्वागताध्यक्ष आ. राजेश टोपे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत दिली.हे साहित्य संमेलन संभाजीनगर मधील हॉटेल बगडियामध्ये आयोजिण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या संमेलनात अनेक मान्यवर साहित्यिक आणि अभ्यासकांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सािहत्यिक डॉ. आ.ह. साळुंके हे राहणार आहेत. या दोन दिवसीय संमेलनाचा प्रारंभ ग्रंथ दिंडीने होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी विधानसभेचे अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. कल्याण काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, चंद्रकांत दानवे आदींची उप्स्थिती राहणार आहे.२३ रोजी दुपारी तीन ते पाच यावेळेत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, धर्मसामंजस्य काळाची अपरिहार्य गरज या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश बडवे तर वक्ते म्हणून डॉ. यशराज महानुभाव, प्रा. बस्वराज कोरे, माजी मंत्री सुरेंद्र भुयार, प्रा. राजेश मिरगे, जैन मुनी अरूण प्रभाजी, अनिल शेवाळकर, प्रा. एम.आर. लामखेडे, ह.भ.प. पंढरीनाथ तावरे यांचा समावेश होणार आहे. याच दिवशी सायंकाळी पाच ते सात यावेळेत चक्रधरांचे सर्वोदयी धर्मजागृती यावर होणार आहे. सायंकाळी सात ते नऊ यावेळेत कविसंमेलन होणार असून, यात अनेक मान्यवर कवींचा समावेश राहणार आहे.संमेलनाचा समारोप सोमवारी होणार असून, यात दोन परिसंवाद होणार आहेत. पहिला परिसंवाद महानुभाविय वाड:मयाचे स्वरूप आणि व्याप्ती, तर दुस-या परिसंवादाचा विषय हा महानुभाविय काव्याची विविधांगी रचना असे कार्यक्रम होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण साहित्यिक व संस्कृती प्रतिष्ठान आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचार प्रबोधनी सेवाभावी संस्थेकडून घेतले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस प्राचार्य डॉ. बी.आ.गायकवाड, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, प्रा. रानमाळ यांची उपस्थिती होती.

टॅग्स :literatureसाहित्यReligious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक