शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राजेश टोपेंना धक्का, तीर्थपुरी नगरपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडाच्या तयारीत

By महेश गायकवाड  | Updated: May 29, 2023 15:24 IST

दीड वर्षात नगरपंचायत क्षेत्रात विकासकामे होत नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे.

जालना : घनसावंगी तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या तीर्थपुरी नगरपंचायतीच्या निवडणुका होऊन जवळपास दीड वर्षाचा कालावधी होत आहे. राष्ट्रवादी व भाजपने एकत्र येत नगरपंचायतीवर सत्ता स्थापन केली. परंतु, दीड वर्षात नगरपंचायत क्षेत्रात विकासकामे होत नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादीपेक्षा इतर पक्ष बरा म्हणण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर आली असून, त्यांनी पक्षबदलाच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा तीर्थपुरीत सुरू आहे. 

आमदार राजेश टोपे यांनी मंत्री असताना तीर्थपुरी नगरपंचायतीला मंजुरी मिळवली. त्यानंतर कारभारी निवडण्यासाठी निवडणुका झाल्या. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी स्थानिक नेते महेंद्र पवार व विद्यमान नगर उपाध्यक्ष शैलेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आणले. या निवडणुकीत भाजपाचे २ तर शिवसेनेचे ३ उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले होते. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. राष्ट्रवादीने भाजपाच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली. त्यांच्या सत्तेला दीड वर्ष आता झाले आहे. या काळात अपेक्षित अशी विकास कामे झाली नाहीत. नगरसेवकांना निधी न मिळाल्याने तेदेखील नाराज आहेत. तीर्थपुरीला शहराचा दर्जा मिळाला. परंतु रस्ते अजून गावखेड्यासारखेच आहेत. तीर्थपुरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यावर मोठा विकास होईल, गावाला शहराचे रूप येईल, अशी अपेक्षा नागरिकांची होती. 

परंतु, ती तूर्त तरी फोल ठरत आहेत. शहरात पंतप्रधान शहरी आवास योजना लागू झाली. परंतु, गरिबांना घरकुल मिळालेले नाही. सांडपाण्याचा प्रश्न कायम आहे. खराब रस्त्याची सुधारणा करण्यासाठी आंदोलने करावी लागली. या सर्व कामांचे निवडणुकीत आश्वासन जनतेला देण्यात आले होते. परंतु, त्याची पूर्तता दीड वर्षात झाली नाही. घनसावंगीला मोठ्या प्रमाणात निधी येतो तर तीर्थपुरीला का मिळत नाही, असा प्रश्न जनता आणि नगरसेवक उपस्थित करत आहेत. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते इतर पक्षात जाण्याचा विचार करत असल्याची चर्चा सध्या शहरात होत आहे. 

विकास निधी मिळाला नाहीतीर्थपुरी शहराच्या विकासासाठी कोणताच निधी आला नाही. घरकुल योजना, शहरातील रस्ते, भूमिगत गटार योजना अशी कोणतीही कामे होत नसेल तर जनतेच्या हितासाठी नगरसेवकांना घेऊन अन्य पक्षाचे दारे ठोठावावे लागेल.- महेंद्र पवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :JalanaजालनाRajesh Topeराजेश टोपेNCPराष्ट्रवादी काँग्रेस