शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

राजेश टोपेंना धक्का, तीर्थपुरी नगरपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडाच्या तयारीत

By महेश गायकवाड  | Updated: May 29, 2023 15:24 IST

दीड वर्षात नगरपंचायत क्षेत्रात विकासकामे होत नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे.

जालना : घनसावंगी तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या तीर्थपुरी नगरपंचायतीच्या निवडणुका होऊन जवळपास दीड वर्षाचा कालावधी होत आहे. राष्ट्रवादी व भाजपने एकत्र येत नगरपंचायतीवर सत्ता स्थापन केली. परंतु, दीड वर्षात नगरपंचायत क्षेत्रात विकासकामे होत नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादीपेक्षा इतर पक्ष बरा म्हणण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर आली असून, त्यांनी पक्षबदलाच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा तीर्थपुरीत सुरू आहे. 

आमदार राजेश टोपे यांनी मंत्री असताना तीर्थपुरी नगरपंचायतीला मंजुरी मिळवली. त्यानंतर कारभारी निवडण्यासाठी निवडणुका झाल्या. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी स्थानिक नेते महेंद्र पवार व विद्यमान नगर उपाध्यक्ष शैलेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आणले. या निवडणुकीत भाजपाचे २ तर शिवसेनेचे ३ उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले होते. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. राष्ट्रवादीने भाजपाच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली. त्यांच्या सत्तेला दीड वर्ष आता झाले आहे. या काळात अपेक्षित अशी विकास कामे झाली नाहीत. नगरसेवकांना निधी न मिळाल्याने तेदेखील नाराज आहेत. तीर्थपुरीला शहराचा दर्जा मिळाला. परंतु रस्ते अजून गावखेड्यासारखेच आहेत. तीर्थपुरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यावर मोठा विकास होईल, गावाला शहराचे रूप येईल, अशी अपेक्षा नागरिकांची होती. 

परंतु, ती तूर्त तरी फोल ठरत आहेत. शहरात पंतप्रधान शहरी आवास योजना लागू झाली. परंतु, गरिबांना घरकुल मिळालेले नाही. सांडपाण्याचा प्रश्न कायम आहे. खराब रस्त्याची सुधारणा करण्यासाठी आंदोलने करावी लागली. या सर्व कामांचे निवडणुकीत आश्वासन जनतेला देण्यात आले होते. परंतु, त्याची पूर्तता दीड वर्षात झाली नाही. घनसावंगीला मोठ्या प्रमाणात निधी येतो तर तीर्थपुरीला का मिळत नाही, असा प्रश्न जनता आणि नगरसेवक उपस्थित करत आहेत. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते इतर पक्षात जाण्याचा विचार करत असल्याची चर्चा सध्या शहरात होत आहे. 

विकास निधी मिळाला नाहीतीर्थपुरी शहराच्या विकासासाठी कोणताच निधी आला नाही. घरकुल योजना, शहरातील रस्ते, भूमिगत गटार योजना अशी कोणतीही कामे होत नसेल तर जनतेच्या हितासाठी नगरसेवकांना घेऊन अन्य पक्षाचे दारे ठोठावावे लागेल.- महेंद्र पवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :JalanaजालनाRajesh Topeराजेश टोपेNCPराष्ट्रवादी काँग्रेस