शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षण अभ्यासासाठी नऊ जणांची समिती जाणार इतर राज्यात - गोपीचंद पडळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 15:15 IST

जर आरक्षण मिळाले नाही तर विधान भवनावर मोर्चा काढणार

जालना : आम्ही आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ज्याप्रमाणे रस्त्यावर लढतोय, त्याप्रमाणेच न्यायालयातही लढतोय. सरकारही आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असून, सरकारने एक समिती तयार केली आहे. ही समिती दोन ते तीन दिवसांत इतर राज्यात जाऊन अभ्यास करणार आहे. त्यात नऊ जणांचा समावेश आहे. जर सरकारने आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही विधानभवनावर मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी जालना शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले की, कोणत्याही हिंसेचे आम्ही समर्थन करीत नाही, आम्ही निषेधच करतो; परंतु, २१ नोव्हेंबर रोजी जी घटना घडली, ती घटना घडविण्यामागे कोण होते. धनगर समाजाच्या प्रतिनिधींशी, समाजबांधवांशी असंवेदनशीलपणे ज्यांनी वागणूक दिली, त्यांची चौकशी करण्याची मागणी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारला आमची विनंती आहे, ज्या पद्धतीने चुकीचे गुन्हे नोंदविले आहे, ते मागे घेण्यात यावे. काही ओबीसी बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला; परंतु, त्यांची नावे जाणूनबुजून टाकण्यात आली आहे. आरक्षणासाठी सरकारला ५० दिवसांचा कालावधी दिला होता; परंतु, सरकारने आरक्षण दिले नाही. राज्यात धनगड समाज नाही. त्याला धनगर समजून सरकारने जीआर काढावा. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन धनगर समाजाला एसटीचे जात प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली होती;

परंतु, सरकारने आम्हाला ते अधिकार नसल्याचे सांगितले. मग आम्ही त्यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि बिहार येथील जीआर दाखविले. त्यानंतर सरकारने याचा अभ्यास करण्यासाठी नऊ जणांची कमिटी नियुक्ती केली आहे. दोन ते तीन दिवसांत ती समिती इतर राज्यांत पाठविली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आम्हाला अभिमान आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आरक्षण दिले. आमचे एकच साहेब आहेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरसाहेब. काही पुरागामी नेते समजणारे त्यांच्या नेतृत्वात अनेक जातीवादी आता आरक्षण मागतात; परंतु, ते साधे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नावही घ्यायला तयार नाही. त्यांचा सन्मानही करायला तयार नाही, असेही ते म्हणाले.

आयजी आणि जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीजालना येथील घटनेबाबत मी अपर पोलिस अधीक्षकांशी बोललो होतो. ते म्हणाले की, काही नुकसान झाले नाही. आम्ही किरकोळ केस दाखल करतो. दहा लोकांची नावे द्या. त्यानंतर मी दहा लाेकांची नावे देण्यास सांगितले; परंतु, नंतर आयजी आले, त्यानंतर काय किल्ली फिरली. त्यांनी ३६ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्यामागे कोणी अदृश्य शक्ती आहे का, त्यामुळे त्यांची आणि जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी मी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पवारांना तुम्ही प्रश्न विचारला?जर धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी आमदार पडळकर यांना विचारला. त्यावर उत्तर देताना पडळकर म्हणाले की, पवारांना तुम्ही असा प्रश्न विचारला का की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का? मी ताकदीने लढतोय, समाज माझ्या पाठीमागे आहे, असे सांगून ते म्हणाले की, जर आरक्षण मिळाले नाही तर विधान भवनावर मोर्चा काढणार आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षण