शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

धनगर आरक्षण अभ्यासासाठी नऊ जणांची समिती जाणार इतर राज्यात - गोपीचंद पडळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 15:15 IST

जर आरक्षण मिळाले नाही तर विधान भवनावर मोर्चा काढणार

जालना : आम्ही आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ज्याप्रमाणे रस्त्यावर लढतोय, त्याप्रमाणेच न्यायालयातही लढतोय. सरकारही आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असून, सरकारने एक समिती तयार केली आहे. ही समिती दोन ते तीन दिवसांत इतर राज्यात जाऊन अभ्यास करणार आहे. त्यात नऊ जणांचा समावेश आहे. जर सरकारने आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही विधानभवनावर मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी जालना शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले की, कोणत्याही हिंसेचे आम्ही समर्थन करीत नाही, आम्ही निषेधच करतो; परंतु, २१ नोव्हेंबर रोजी जी घटना घडली, ती घटना घडविण्यामागे कोण होते. धनगर समाजाच्या प्रतिनिधींशी, समाजबांधवांशी असंवेदनशीलपणे ज्यांनी वागणूक दिली, त्यांची चौकशी करण्याची मागणी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारला आमची विनंती आहे, ज्या पद्धतीने चुकीचे गुन्हे नोंदविले आहे, ते मागे घेण्यात यावे. काही ओबीसी बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला; परंतु, त्यांची नावे जाणूनबुजून टाकण्यात आली आहे. आरक्षणासाठी सरकारला ५० दिवसांचा कालावधी दिला होता; परंतु, सरकारने आरक्षण दिले नाही. राज्यात धनगड समाज नाही. त्याला धनगर समजून सरकारने जीआर काढावा. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन धनगर समाजाला एसटीचे जात प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली होती;

परंतु, सरकारने आम्हाला ते अधिकार नसल्याचे सांगितले. मग आम्ही त्यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि बिहार येथील जीआर दाखविले. त्यानंतर सरकारने याचा अभ्यास करण्यासाठी नऊ जणांची कमिटी नियुक्ती केली आहे. दोन ते तीन दिवसांत ती समिती इतर राज्यांत पाठविली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आम्हाला अभिमान आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आरक्षण दिले. आमचे एकच साहेब आहेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरसाहेब. काही पुरागामी नेते समजणारे त्यांच्या नेतृत्वात अनेक जातीवादी आता आरक्षण मागतात; परंतु, ते साधे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नावही घ्यायला तयार नाही. त्यांचा सन्मानही करायला तयार नाही, असेही ते म्हणाले.

आयजी आणि जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीजालना येथील घटनेबाबत मी अपर पोलिस अधीक्षकांशी बोललो होतो. ते म्हणाले की, काही नुकसान झाले नाही. आम्ही किरकोळ केस दाखल करतो. दहा लोकांची नावे द्या. त्यानंतर मी दहा लाेकांची नावे देण्यास सांगितले; परंतु, नंतर आयजी आले, त्यानंतर काय किल्ली फिरली. त्यांनी ३६ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्यामागे कोणी अदृश्य शक्ती आहे का, त्यामुळे त्यांची आणि जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी मी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पवारांना तुम्ही प्रश्न विचारला?जर धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी आमदार पडळकर यांना विचारला. त्यावर उत्तर देताना पडळकर म्हणाले की, पवारांना तुम्ही असा प्रश्न विचारला का की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का? मी ताकदीने लढतोय, समाज माझ्या पाठीमागे आहे, असे सांगून ते म्हणाले की, जर आरक्षण मिळाले नाही तर विधान भवनावर मोर्चा काढणार आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षण