शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

मराठा समाजाच्या १४ मागण्यांवर मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय; वडीकाळ्यातील उपोषण स्थगित

By महेश गायकवाड  | Updated: April 1, 2023 17:05 IST

राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्यांवर शासनाने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी वडीकाळ्या गावात बेमुदत उपोषण सुरू केले होते.

जालना : मराठा आरक्षणासह समाजाच्या १४ मागण्या फेब्रुवारी महिन्यात सरकारने मान्य केल्या. परंतु, त्यातील एकाही मागणीवर निर्णय घेऊन अंमलबजावणी केली नाही. म्हणून तीन दिवसांपासून अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावात बेमुदत उपोषण सुरू झाले होते. हे उपोषण पुन्हा एकदा सरकारच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळामार्फत उपोषणकर्त्यांना शनिवारी दिले आहे.  

राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्यांवर शासनाने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी गुरुवारी वडीकाळ्या गावात आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात रस्तारोको आंदोलनेही सुरू झाली होती. त्यामुळे सरकारने वेळीच या आंदोलनात हस्तक्षेप करत हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे शिष्टमंडळ वडीकाळ्या गावात पाठवले.

या शिष्टमंडळाने उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी समाजाच्या मागण्यांवर सलग तीन तास चर्चा केली. तसेच मंत्री दादा भुसे, शंभुराजे देसाई, संदीपान भुमरे यांनीही दूरध्वनीद्वारे सरकारची भूमिका स्पष्ट करत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अर्जुन खोतकर यांच्या हस्ते हे उपोषण स्थगित करण्यात आले.

सरकारला आठ दिवसांची मुदत आम्ही बेमुदत उपोषण फक्त आठ दिवसांसाठी स्थगित केले आहे. या काळात कॅबिनेटच्या बैठकीत १४ मागण्यांवर निर्णय होऊन त्या तत्काळ लागू न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा यावेळी उपस्थित मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या सरकारच्या शिष्टमंडळाला दिला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाState Governmentराज्य सरकार