शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मराठा समाजाच्या १४ मागण्यांवर मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय; वडीकाळ्यातील उपोषण स्थगित

By महेश गायकवाड  | Updated: April 1, 2023 17:05 IST

राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्यांवर शासनाने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी वडीकाळ्या गावात बेमुदत उपोषण सुरू केले होते.

जालना : मराठा आरक्षणासह समाजाच्या १४ मागण्या फेब्रुवारी महिन्यात सरकारने मान्य केल्या. परंतु, त्यातील एकाही मागणीवर निर्णय घेऊन अंमलबजावणी केली नाही. म्हणून तीन दिवसांपासून अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावात बेमुदत उपोषण सुरू झाले होते. हे उपोषण पुन्हा एकदा सरकारच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळामार्फत उपोषणकर्त्यांना शनिवारी दिले आहे.  

राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्यांवर शासनाने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी गुरुवारी वडीकाळ्या गावात आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात रस्तारोको आंदोलनेही सुरू झाली होती. त्यामुळे सरकारने वेळीच या आंदोलनात हस्तक्षेप करत हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे शिष्टमंडळ वडीकाळ्या गावात पाठवले.

या शिष्टमंडळाने उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी समाजाच्या मागण्यांवर सलग तीन तास चर्चा केली. तसेच मंत्री दादा भुसे, शंभुराजे देसाई, संदीपान भुमरे यांनीही दूरध्वनीद्वारे सरकारची भूमिका स्पष्ट करत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अर्जुन खोतकर यांच्या हस्ते हे उपोषण स्थगित करण्यात आले.

सरकारला आठ दिवसांची मुदत आम्ही बेमुदत उपोषण फक्त आठ दिवसांसाठी स्थगित केले आहे. या काळात कॅबिनेटच्या बैठकीत १४ मागण्यांवर निर्णय होऊन त्या तत्काळ लागू न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा यावेळी उपस्थित मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या सरकारच्या शिष्टमंडळाला दिला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाState Governmentराज्य सरकार