शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

शेतकरी, सर्व सामान्यांना वेळ देणारा एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री मागील ४० वर्षांत झाला नाही: अब्दुल सत्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 17:06 IST

शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे धोरण सरकार तयार करणार

शेषराव वायाळपरतूर (जालना) : सर्वसामान्य माणूस व शेतकरी वर्गाला वेळ देणारा मुख्यमंत्री आपण ४० वर्षांत पाहिला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे सरकार आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याबरोबरच कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञांच्या मदतीने अधिक उत्पन्न देणाऱ्या विविध पिकांच्या वाणांची निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

परतूर येथे आयोजित हिंदुगर्व गर्जना मेळाव्यात ते बाेलत होते. या मेळाव्यास माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार हेमंत पाटील, पंडित भुतेकर, राजेंद्र ठोंबरे, प्रल्हाद बोराडे, नितीन राठोड, उद्धव बोराडे, जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांची उपस्थिती होती.

यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेची अडचण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्ग काढत आपल्या रिक्षात ५० आमदार घेऊन शिवसैनिकांना न्याय दिला. सर्वसामान्य माणूस व शेतकरी यांना वेळ देणारा असा मुख्यमंत्री आपण ४० वर्षांत पाहिला नाही. जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल शहर विकासासाठी मागतील तेवढा निधी त्यांना देऊ. असे सांगून येत्या पाच तारखेला मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. अर्जुन खोतकर यांनीही विकासकामासाठी आमचे सरकार निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब चिखले, अविनाश कापसे, प्रल्हाद बोराडे, उद्धव बोराडे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAbdul Sattarअब्दुल सत्तारJalanaजालना