शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी, सर्व सामान्यांना वेळ देणारा एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री मागील ४० वर्षांत झाला नाही: अब्दुल सत्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 17:06 IST

शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे धोरण सरकार तयार करणार

शेषराव वायाळपरतूर (जालना) : सर्वसामान्य माणूस व शेतकरी वर्गाला वेळ देणारा मुख्यमंत्री आपण ४० वर्षांत पाहिला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे सरकार आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याबरोबरच कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञांच्या मदतीने अधिक उत्पन्न देणाऱ्या विविध पिकांच्या वाणांची निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

परतूर येथे आयोजित हिंदुगर्व गर्जना मेळाव्यात ते बाेलत होते. या मेळाव्यास माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार हेमंत पाटील, पंडित भुतेकर, राजेंद्र ठोंबरे, प्रल्हाद बोराडे, नितीन राठोड, उद्धव बोराडे, जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांची उपस्थिती होती.

यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेची अडचण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्ग काढत आपल्या रिक्षात ५० आमदार घेऊन शिवसैनिकांना न्याय दिला. सर्वसामान्य माणूस व शेतकरी यांना वेळ देणारा असा मुख्यमंत्री आपण ४० वर्षांत पाहिला नाही. जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल शहर विकासासाठी मागतील तेवढा निधी त्यांना देऊ. असे सांगून येत्या पाच तारखेला मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. अर्जुन खोतकर यांनीही विकासकामासाठी आमचे सरकार निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब चिखले, अविनाश कापसे, प्रल्हाद बोराडे, उद्धव बोराडे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAbdul Sattarअब्दुल सत्तारJalanaजालना