शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

राज्यातील ९५ टक्के बेड रिकामे, सर्व बाबींच्या अभ्यासानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय : राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 12:25 IST

युरोप खंडात कोरोनाची लाट सुरू आहे. असे असले तरी तेथील शाळा सुरू आहेत.

जालना : युरोप खंडामध्ये कोरोनाची लाट सुरू असताना शाळाही सुरू आहेत. राज्यभरातील रुग्णालयांमधील ९० ते ९५ टक्के बेड रिकामे असून, हॉस्पिटलायझेशनही कमी आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करूनच शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत कोविडचे सर्व नियम पाळले जाणार असून, पालकांनीही मुलांना शाळेत पाठवावे, योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी जालना येथील एका कार्यक्रमात केले.

शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी पालक मुलांना शाळेत पाठविण्यास विरोध करीत असल्याबाबत टोपे यांना विचारणा करण्यात आली होती. टोपे म्हणाले, युरोप खंडात कोरोनाची लाट सुरू आहे. असे असले तरी तेथील शाळा सुरू आहेत. शाळा सातत्याने बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास करण्याचा हा प्रमुख कालावधी असतो. यातच मुलांना घरी ठेवले तर त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने सर्व बाबींचा विचार करून घेतलेला आहे. ज्या जिल्ह्यात अधिक बाधित रुग्ण असतील तेथील स्थानिक प्रशासन व पालकमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावयाचा आहे.

शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आरोग्याकडे लक्ष ठेवण्याबाबत सूचित केले आहे. कोणी कोरोनाबाधित आढळले तर इतरांची तपासणी करून योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. सध्या राज्यातील ९० ते ९५ टक्के बेड रिकामे आहेत. आयसीयू किंवा ऑक्सिजन बेड हे ९५ टक्के रिकामे आहेत. ९० टक्के बाधित होम आयसोलेशनमध्ये आहेत. टास्क फोर्सचाही विचार याबाबत घेण्यात आला आहे. हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण कमी राहिले तर सध्या लागू असलेले निर्बंधही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कमी करता येऊ शकतील, असे सांगतानाच राज्यातील नागरिकांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा