शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

८० कोटीचे सिंचन प्रकल्प पोहोचले ६७२ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:55 IST

जालना जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष कागदोपत्री संपला असल्याचे जाहीर केले आहे. परंतु ही वस्तुस्थिती नाही.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष कागदोपत्री संपला असल्याचे जाहीर केले आहे. परंतु ही वस्तुस्थिती नाही. जालना जिल्ह्यातील हातवण, बरबडा आणि आकणी या मध्यम प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. हे तीन प्रकल्प ज्यावेळी मंजूर झाले होते, त्यावेळी केवळ ८० कोटी रूपये लागणार होते. परंतु या प्रकल्पाला वेळेत निधी न मिळाल्याने हे प्रकल्प रखडले असून, आता भूसंपादनासाठी आणि प्रत्यक्ष कामासाठी जवळपास ६७२ कोटी रूपये लागणार आहेत. हा निधी मिळाल्यास जालना जिल्ह्यात मोठी सिंचन क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याची गरज आहे.बळीराजा जलसंजीवनी योजनेतून या प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळावी म्हणून प्रकल्पांचा नव्याने विचार सुरू आहे. हातवण हा ब्रहत सिंचन प्रकल्प आहे. तो २००७-२००८ मध्ये या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती.त्यावेळी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी केवळ ५३ कोटी रूपये लागणार होते. त्यात बापकळ या गावाचे पुनर्वसन होणार आहे. ते लांबल्याने हा प्रकल्प आज घडीला ३८० कोटी रूपयांवर पोहोचला आहे. मंठा तालुक्यातील बरबडा हा प्रकल्प १९९९-२००० मध्ये मंजूर झाला होता, त्यावेळी केवळ १२ कोटी रूपये लागणार होते, तो आज १८४ कोटी रूपयांवर पोहोचला असून, हा प्रकल्प उभारणीसाठी आकणी या गावाचे पुनर्वसन होणार आहे.तर मंठा तालुक्यातील दुसरा एक महत्त्वाचा सिंचन प्रकल्प म्हणजे पाटोदा हा होय, या प्रकल्पाला २००३ मध्ये मंजुरी मिळाली होती.त्यावेळी फक्त १५ कोटी रूपये लागणार होते, तो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ११८ कोटी रूपये लागणार आहेत.बळीराजा योजनेत समावेश; पण...जालना जिल्ह्यातील सात प्रमुख सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत सहभाग करण्यात आला आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दिल्लीत बैठक घेऊन या प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी होती. आणि त्या योजनेत जालना जिल्ह्यातील सात प्रकल्पांचा समावेश केला होता. मात्र बळीराजा जलसंजीवनी योजनेतून २५ टक्के निधी हा प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर मिळणार असून, तो देखील नाबार्डकडून अत्यल्प दराने कर्ज घेतल्याने कमी व्याजदराने यासाठी निधी मिळू शकतो. विशेष म्हणजे या तिन्ही प्रकल्पांचे काम हे पुनर्वसनासाठी लागणाऱ्या जास्तीच्या निधीमुळे रखडल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजना