शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

८० कोटीचे सिंचन प्रकल्प पोहोचले ६७२ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:55 IST

जालना जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष कागदोपत्री संपला असल्याचे जाहीर केले आहे. परंतु ही वस्तुस्थिती नाही.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष कागदोपत्री संपला असल्याचे जाहीर केले आहे. परंतु ही वस्तुस्थिती नाही. जालना जिल्ह्यातील हातवण, बरबडा आणि आकणी या मध्यम प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. हे तीन प्रकल्प ज्यावेळी मंजूर झाले होते, त्यावेळी केवळ ८० कोटी रूपये लागणार होते. परंतु या प्रकल्पाला वेळेत निधी न मिळाल्याने हे प्रकल्प रखडले असून, आता भूसंपादनासाठी आणि प्रत्यक्ष कामासाठी जवळपास ६७२ कोटी रूपये लागणार आहेत. हा निधी मिळाल्यास जालना जिल्ह्यात मोठी सिंचन क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याची गरज आहे.बळीराजा जलसंजीवनी योजनेतून या प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळावी म्हणून प्रकल्पांचा नव्याने विचार सुरू आहे. हातवण हा ब्रहत सिंचन प्रकल्प आहे. तो २००७-२००८ मध्ये या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती.त्यावेळी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी केवळ ५३ कोटी रूपये लागणार होते. त्यात बापकळ या गावाचे पुनर्वसन होणार आहे. ते लांबल्याने हा प्रकल्प आज घडीला ३८० कोटी रूपयांवर पोहोचला आहे. मंठा तालुक्यातील बरबडा हा प्रकल्प १९९९-२००० मध्ये मंजूर झाला होता, त्यावेळी केवळ १२ कोटी रूपये लागणार होते, तो आज १८४ कोटी रूपयांवर पोहोचला असून, हा प्रकल्प उभारणीसाठी आकणी या गावाचे पुनर्वसन होणार आहे.तर मंठा तालुक्यातील दुसरा एक महत्त्वाचा सिंचन प्रकल्प म्हणजे पाटोदा हा होय, या प्रकल्पाला २००३ मध्ये मंजुरी मिळाली होती.त्यावेळी फक्त १५ कोटी रूपये लागणार होते, तो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ११८ कोटी रूपये लागणार आहेत.बळीराजा योजनेत समावेश; पण...जालना जिल्ह्यातील सात प्रमुख सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत सहभाग करण्यात आला आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दिल्लीत बैठक घेऊन या प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी होती. आणि त्या योजनेत जालना जिल्ह्यातील सात प्रकल्पांचा समावेश केला होता. मात्र बळीराजा जलसंजीवनी योजनेतून २५ टक्के निधी हा प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर मिळणार असून, तो देखील नाबार्डकडून अत्यल्प दराने कर्ज घेतल्याने कमी व्याजदराने यासाठी निधी मिळू शकतो. विशेष म्हणजे या तिन्ही प्रकल्पांचे काम हे पुनर्वसनासाठी लागणाऱ्या जास्तीच्या निधीमुळे रखडल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजना