शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

८० कोटीचे सिंचन प्रकल्प पोहोचले ६७२ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:55 IST

जालना जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष कागदोपत्री संपला असल्याचे जाहीर केले आहे. परंतु ही वस्तुस्थिती नाही.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष कागदोपत्री संपला असल्याचे जाहीर केले आहे. परंतु ही वस्तुस्थिती नाही. जालना जिल्ह्यातील हातवण, बरबडा आणि आकणी या मध्यम प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. हे तीन प्रकल्प ज्यावेळी मंजूर झाले होते, त्यावेळी केवळ ८० कोटी रूपये लागणार होते. परंतु या प्रकल्पाला वेळेत निधी न मिळाल्याने हे प्रकल्प रखडले असून, आता भूसंपादनासाठी आणि प्रत्यक्ष कामासाठी जवळपास ६७२ कोटी रूपये लागणार आहेत. हा निधी मिळाल्यास जालना जिल्ह्यात मोठी सिंचन क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याची गरज आहे.बळीराजा जलसंजीवनी योजनेतून या प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळावी म्हणून प्रकल्पांचा नव्याने विचार सुरू आहे. हातवण हा ब्रहत सिंचन प्रकल्प आहे. तो २००७-२००८ मध्ये या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती.त्यावेळी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी केवळ ५३ कोटी रूपये लागणार होते. त्यात बापकळ या गावाचे पुनर्वसन होणार आहे. ते लांबल्याने हा प्रकल्प आज घडीला ३८० कोटी रूपयांवर पोहोचला आहे. मंठा तालुक्यातील बरबडा हा प्रकल्प १९९९-२००० मध्ये मंजूर झाला होता, त्यावेळी केवळ १२ कोटी रूपये लागणार होते, तो आज १८४ कोटी रूपयांवर पोहोचला असून, हा प्रकल्प उभारणीसाठी आकणी या गावाचे पुनर्वसन होणार आहे.तर मंठा तालुक्यातील दुसरा एक महत्त्वाचा सिंचन प्रकल्प म्हणजे पाटोदा हा होय, या प्रकल्पाला २००३ मध्ये मंजुरी मिळाली होती.त्यावेळी फक्त १५ कोटी रूपये लागणार होते, तो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ११८ कोटी रूपये लागणार आहेत.बळीराजा योजनेत समावेश; पण...जालना जिल्ह्यातील सात प्रमुख सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत सहभाग करण्यात आला आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दिल्लीत बैठक घेऊन या प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी होती. आणि त्या योजनेत जालना जिल्ह्यातील सात प्रकल्पांचा समावेश केला होता. मात्र बळीराजा जलसंजीवनी योजनेतून २५ टक्के निधी हा प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर मिळणार असून, तो देखील नाबार्डकडून अत्यल्प दराने कर्ज घेतल्याने कमी व्याजदराने यासाठी निधी मिळू शकतो. विशेष म्हणजे या तिन्ही प्रकल्पांचे काम हे पुनर्वसनासाठी लागणाऱ्या जास्तीच्या निधीमुळे रखडल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजना