शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

७८ हजार शेतकरी आधार प्रमाणीकरणापासून दूर; औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १० हजार शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 08:14 IST

कर्जमुक्ती योजना

- विजय मुंडे जालना : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी १५ नोव्हेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदतीचे चार दिवस शिल्लक असतानाही अद्याप ७८ हजारांवर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. निर्धारित वेळेत आधार प्रमाणीकरण न करणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक १० हजार शेतकरी हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. 

कोरोनामुळे रखडलेली कर्जमुक्ती योजना पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर विशिष्ट क्रमांकासह नावे आलेली असतानाही असंख्य शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. अशा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविली जात आहे. 

या योजनेची अंतिम मुदत चार दिवसांवर आलेली असताना राज्यभरातील तब्बल ७८ हजारांवर शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. हे प्रमाणीकरण केले नाही, तर लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. मयत लाभार्थी शेतकऱ्यांच्या वारसांनीही निर्धारित वेळेत बँकांकडे कागदपत्रे दाखल करून योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे. 

...तर ४११ कोटींचे नुकसान           

शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण वेळेत केले नाही.  तर त्यांचे ४११ काेटी रुपयांचे कर्ज माफ होणार नाही. किंबहुना यात त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना