शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

७८ हजार शेतकरी आधार प्रमाणीकरणापासून दूर; औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १० हजार शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 08:14 IST

कर्जमुक्ती योजना

- विजय मुंडे जालना : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी १५ नोव्हेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदतीचे चार दिवस शिल्लक असतानाही अद्याप ७८ हजारांवर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. निर्धारित वेळेत आधार प्रमाणीकरण न करणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक १० हजार शेतकरी हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. 

कोरोनामुळे रखडलेली कर्जमुक्ती योजना पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर विशिष्ट क्रमांकासह नावे आलेली असतानाही असंख्य शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. अशा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविली जात आहे. 

या योजनेची अंतिम मुदत चार दिवसांवर आलेली असताना राज्यभरातील तब्बल ७८ हजारांवर शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. हे प्रमाणीकरण केले नाही, तर लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. मयत लाभार्थी शेतकऱ्यांच्या वारसांनीही निर्धारित वेळेत बँकांकडे कागदपत्रे दाखल करून योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे. 

...तर ४११ कोटींचे नुकसान           

शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण वेळेत केले नाही.  तर त्यांचे ४११ काेटी रुपयांचे कर्ज माफ होणार नाही. किंबहुना यात त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना