शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

‘समृद्धी’ महामार्गासाठी ७५ टक्के भूसंपादन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:22 IST

बदनापूर तालुक्यात नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी ७५ टक्के जमीन संपादन झाले आहे. फेरमूल्यांकन व न्यायालयीन प्रकरणांमुळे ४२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन अद्याप अपूर्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यात नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी ७५ टक्के जमीन संपादन झाले आहे. फेरमूल्यांकन व न्यायालयीन प्रकरणांमुळे ४२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन अद्याप अपूर्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले.तालुक्यातील गेवराई बाजार, दुधनवाडी, सोमठाणा, गोकुळवाडी, अकोला निकळक, भराडखेडा, नजीकपांगरी, केळीगव्हाण, खादगाव या दहा गावांमधून समृद्धी महामार्ग जात आहे. यासाठी तालुक्यात एकूण १६० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. दहा गावांमध्ये आतापर्यंत एकूण ११८ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर ४२ हेक्टर जमिनीचे संपादन बाकी आहे. परंतु अंतिम टप्प्यात जमीन संपादनाच्या कामाची गती मंदावल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बोर, विहीर, पाईपलाईन, विविध झाडे आदींची नोंद संयुक्त मोजणीत घेतलेली नसल्याची तक्रार केली आहे. तर काहींच्या गटांची नोंद घेताना अदलाबदल झाले आहेत. बागायती जमिनी हंगामी बागायत दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संयुक्त मोजणीचे काम परत करण्याची मागणी बाधित शेतक-यांनी केली आहे.काही शेतक-यांच्या जमिनीचे न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत. अशा सुमारे १०० ते ११० शेतक-यांच्या जमिनीचे संपादन अद्याप अपूर्ण आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी