शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जालना जिल्ह्यात पाच महिन्यांत ६६ जणांनी संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:24 IST

गेल्या पाच महिन्यांत जिल्हाभरातील तब्बल ६६ जणांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, असे म्हणतात. मात्र, ताणतणावाच्या आयुष्यात प्रत्येकालाच हे शक्य होत नाही. दिवसेंदिवस प्रत्येक व्यक्तीचा ताणतणाव वाढत चालला आहे. गेल्या पाच महिन्यांत जिल्हाभरातील तब्बल ६६ जणांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. या आत्महत्यांमध्ये गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.जीवनातील आव्हानाला व्यक्ती कंटाळली की, ती आत्महत्याकडेच वळते, असे म्हणतात. तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने असतोच, मात्र आत्महत्या हा त्यावर उपाय नाही. गेल्या पाच महिन्यात जिल्हाभरातील ६६ जणांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. गळफास घेऊन ४० जणांनी आत्महत्या केल्या, तर विष प्राशन करुन २० तसेच इतर प्रकारे ६ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. अर्थिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, अती आदर्शवादी विचार अशी अनेक कारणे आत्महत्येमागे आहेत. जीवन खूप गतिमान झाल्याने स्वत: शी संवाद साधण्यासाठी वेळ दिला जात नाही. नात्यांसाठी वेळ दिला जात नाही. वास्तवापेक्षा आभासी जगात जास्त रमत आहेत. स्वत:चा स्वीकार करणे हे फार महत्वाचे असते, पण इतरांच्या नजरेतून स्वत: ची प्रतिमा जोखली जाते. सामाजिक प्रतिमेला जपण्याच्या आटोकाट प्रयत्नात क्षमतांचा विचार अपयश हा आयुष्याचा एक भाग आहे. मात्र, यातील अनेकजण ताणतणाव सहन न झाल्याने आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनासह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन जनजागृती मोहीम उभारण्याची गरज आहे.गळफास घेतलेल्यांची संख्या जास्तया आत्महत्येच्या घटनांमध्ये गळफास, रेल्वेखाली उडी मारणे, विष प्राशन करणे आदी प्रकारे आत्महत्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गळफास घेऊन ४० तर विष प्राशन करुन २० जणांनी आत्महत्या केलेली आहे. ६ जणांनी इतर प्रकारे आपली जीवनयात्रा संपविली आहे.समुपदेशनाची गरजविवाहविषयक समुपदेशनाची गरज निर्माण होऊ लागली आहे. कारण, कुटुंबाची जबाबदारी, प्रेमभंग किंवा वैवाहिक संबंधातील अडचणींमुळे पुरुष मंडळींना नेहमी समस्यांना सामोरे जावे लागते. यावर वेळेच उपाययोजना न केल्यास ते मानसिक रोगी बनतात व नकळतपणे आत्महत्येचा प्रयत्न करतात.

टॅग्स :Suicideआत्महत्याSocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी