शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

जालना जिल्ह्यात पाच महिन्यांत ६६ जणांनी संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:24 IST

गेल्या पाच महिन्यांत जिल्हाभरातील तब्बल ६६ जणांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, असे म्हणतात. मात्र, ताणतणावाच्या आयुष्यात प्रत्येकालाच हे शक्य होत नाही. दिवसेंदिवस प्रत्येक व्यक्तीचा ताणतणाव वाढत चालला आहे. गेल्या पाच महिन्यांत जिल्हाभरातील तब्बल ६६ जणांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. या आत्महत्यांमध्ये गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.जीवनातील आव्हानाला व्यक्ती कंटाळली की, ती आत्महत्याकडेच वळते, असे म्हणतात. तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने असतोच, मात्र आत्महत्या हा त्यावर उपाय नाही. गेल्या पाच महिन्यात जिल्हाभरातील ६६ जणांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. गळफास घेऊन ४० जणांनी आत्महत्या केल्या, तर विष प्राशन करुन २० तसेच इतर प्रकारे ६ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. अर्थिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, अती आदर्शवादी विचार अशी अनेक कारणे आत्महत्येमागे आहेत. जीवन खूप गतिमान झाल्याने स्वत: शी संवाद साधण्यासाठी वेळ दिला जात नाही. नात्यांसाठी वेळ दिला जात नाही. वास्तवापेक्षा आभासी जगात जास्त रमत आहेत. स्वत:चा स्वीकार करणे हे फार महत्वाचे असते, पण इतरांच्या नजरेतून स्वत: ची प्रतिमा जोखली जाते. सामाजिक प्रतिमेला जपण्याच्या आटोकाट प्रयत्नात क्षमतांचा विचार अपयश हा आयुष्याचा एक भाग आहे. मात्र, यातील अनेकजण ताणतणाव सहन न झाल्याने आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनासह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन जनजागृती मोहीम उभारण्याची गरज आहे.गळफास घेतलेल्यांची संख्या जास्तया आत्महत्येच्या घटनांमध्ये गळफास, रेल्वेखाली उडी मारणे, विष प्राशन करणे आदी प्रकारे आत्महत्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गळफास घेऊन ४० तर विष प्राशन करुन २० जणांनी आत्महत्या केलेली आहे. ६ जणांनी इतर प्रकारे आपली जीवनयात्रा संपविली आहे.समुपदेशनाची गरजविवाहविषयक समुपदेशनाची गरज निर्माण होऊ लागली आहे. कारण, कुटुंबाची जबाबदारी, प्रेमभंग किंवा वैवाहिक संबंधातील अडचणींमुळे पुरुष मंडळींना नेहमी समस्यांना सामोरे जावे लागते. यावर वेळेच उपाययोजना न केल्यास ते मानसिक रोगी बनतात व नकळतपणे आत्महत्येचा प्रयत्न करतात.

टॅग्स :Suicideआत्महत्याSocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी