शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

रोहयोच्या कामावर ६५०० मजूर कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:49 IST

प्रशासनाने नियोजित केलेल्या रोहयोच्या कामांवर अद्यापही ६ हजार ६७१ मजूर काम करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा सुरु होऊन महिन्याभराचा कालावधी उलटाला आहे. मात्र, अद्यापही भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यात इतरत्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतीची कामे ठप्प असून, प्रशासनाने नियोजित केलेल्या रोहयोच्या कामांवर अद्यापही ६ हजार ६७१ मजूर काम करीत आहे.गतवर्षी पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा दुष्काळी परिस्थिती नागरिकांचे स्थलांतर होऊ नये, त्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाच्यावतीने रोजगार हमी योजनेअतंर्गत कामे देण्यात आली. कामे सुरु झाल्यापासून या कामावर दिवसेंदिवस मजूरांच्या संख्येत वाढ होत होती. मे महिन्याच्या अखेर पर्यंत रोहयोच्या कामावरील मजूरांची संख्या २८ हजारापर्यंत पोहोचली होती. जून महिन्यात पावसाळा सुरु झाल्याने मजुरांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली. पावसाळा सुरु होऊन महिन्याभराचा कालावधी उलटाला आहे. अद्यापही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पडला नाही. परिणामी शेतातील कामेही ठप्प आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. मजुरांना काम मिळावे, म्हणून ग्रामपंचायतीकडून कामांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ७७९ ग्रामपंचायतीपैकी १७६ ग्रामपंचायती अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर ६ हजार ६७१ मजूर कामावर आहे.घनसावंगी तालुक्यातही कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीसह बांधकामे व इतर कामे ठप्प आहेत. तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीपैकी ३१ ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक १ हजार ९०८ मजूर कार्यरत आहेत. तर मंठा तालुक्यात सर्वात कमी ८७ मजूर कामावर आहे.शेतीची कामे दिवाळीनंतर आटोपल्यावर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दरवर्षी रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी वाढत असते. रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते, बोडी, खोलीकरण, सिमेंट बंधारे, नाला सरळीकरण, शौचालय, नाडेप कंपोस्ट, घरकूल, सिंचन विहीर यासह अनेक कामे केली जात असून, या कामावर मजूर कार्यरत आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळ