शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

रोहयोच्या कामावर ६५०० मजूर कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:49 IST

प्रशासनाने नियोजित केलेल्या रोहयोच्या कामांवर अद्यापही ६ हजार ६७१ मजूर काम करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा सुरु होऊन महिन्याभराचा कालावधी उलटाला आहे. मात्र, अद्यापही भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यात इतरत्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतीची कामे ठप्प असून, प्रशासनाने नियोजित केलेल्या रोहयोच्या कामांवर अद्यापही ६ हजार ६७१ मजूर काम करीत आहे.गतवर्षी पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा दुष्काळी परिस्थिती नागरिकांचे स्थलांतर होऊ नये, त्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाच्यावतीने रोजगार हमी योजनेअतंर्गत कामे देण्यात आली. कामे सुरु झाल्यापासून या कामावर दिवसेंदिवस मजूरांच्या संख्येत वाढ होत होती. मे महिन्याच्या अखेर पर्यंत रोहयोच्या कामावरील मजूरांची संख्या २८ हजारापर्यंत पोहोचली होती. जून महिन्यात पावसाळा सुरु झाल्याने मजुरांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली. पावसाळा सुरु होऊन महिन्याभराचा कालावधी उलटाला आहे. अद्यापही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पडला नाही. परिणामी शेतातील कामेही ठप्प आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. मजुरांना काम मिळावे, म्हणून ग्रामपंचायतीकडून कामांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ७७९ ग्रामपंचायतीपैकी १७६ ग्रामपंचायती अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर ६ हजार ६७१ मजूर कामावर आहे.घनसावंगी तालुक्यातही कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीसह बांधकामे व इतर कामे ठप्प आहेत. तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीपैकी ३१ ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक १ हजार ९०८ मजूर कार्यरत आहेत. तर मंठा तालुक्यात सर्वात कमी ८७ मजूर कामावर आहे.शेतीची कामे दिवाळीनंतर आटोपल्यावर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दरवर्षी रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी वाढत असते. रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते, बोडी, खोलीकरण, सिमेंट बंधारे, नाला सरळीकरण, शौचालय, नाडेप कंपोस्ट, घरकूल, सिंचन विहीर यासह अनेक कामे केली जात असून, या कामावर मजूर कार्यरत आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळ