शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

६ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:29 IST

अद्यापही ६ हजार १४९ पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ४८ कोटी ९६ लाख ५१ हजार रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणे बाकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा तालुक्यातील २७ हजार ९५८ शेतकऱ्यांना १३४ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली असून, अद्यापही ६ हजार १४९ पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ४८ कोटी ९६ लाख ५१ हजार रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणे बाकी आहे. या शेतकऱ्यांनी दीड लाखांपेक्षा शिल्लक असलेल्या ४२ कोटी रूपयाच्या कर्जाचा भरणा केल्यावर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.राज्य शासनाने शेतक-यांना १ लाख ५० हजार रूपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी तालुक्यातून ६३ हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यामध्ये वेगवेगळी प्रतवारी करण्यात आली होती. पहिल्या व दुस-या टप्प्यांमध्ये तालुक्यातील २७ हजार ९५८ शेतक-यांना १३४ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली. तर पात्र ठरलेल्या ६ हजार १४९ शेतक-यांना विविध बँकेचे थकलेले कर्ज वाटप केल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.बँकेचे थकलेले कर्ज भरल्यानंतर या शेतक-यांना ४९ कोटी रूपयाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम भरण्यासाठी शासनाने आतापर्यंत तीन ते चारवेळा मुदत वाढ दिली असून, अद्यापही शेतक-यांनी थकबाकीचा भरणा बँकेत केला नाही. त्यामुळे या शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. ही रक्कम भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी सागितले की, तालुक्यातील शेतक-यांना १३४ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाला असून, आणखी ६ हजार १४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. त्यांना ४८ कोटी ९६ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. मात्र त्यांनी दीड लाखापेक्षा जास्तीचे थकीत असलेले ४२ कोटी रूपये ३१ मार्चपर्यंत बँकेत भरणे आवश्यक आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी