शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

भू-विकास बँक जालन्यात ५६ कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST

त्यावेळेपासून जिल्हा सहकार निबंधक हे अवसायक म्हणून येथे काम पाहत आहेत. राज्य सरकारने या बँकांसाठीचा निर्णय घेतल्यानंतर बँकेचा आढावा ...

त्यावेळेपासून जिल्हा सहकार निबंधक हे अवसायक म्हणून येथे काम पाहत आहेत. राज्य सरकारने या बँकांसाठीचा निर्णय घेतल्यानंतर बँकेचा आढावा घेतला असता, जालना जिल्ह्यातील जवळपास तीन हजार शेतकऱ्यांकडे ५६ कोटी ४३ लाख रुपये थकबाकी आहे. त्यांच्यासाठी ओटीएस ही वन टाईम सेटलमेंट योजना जाहीर केली होती. त्यात केवळ दोन हजार शेतकरी पात्र ठरले असून, त्यांची कर्ज थकबाकी ही १७ कोटी रुपये आहे. या बँकेत जवळपास ८५ कर्मचारी असून, त्यांचे वेतनासह भविष्य निर्वाह निधी व अन्य असे मिळून जवळपास ९ कोटी ७२ लाख रुपये देणी देणे शिल्लक आहे. या बँकेस सर्वेक्षण क्रमांक ४८८ मध्ये ४५ हजार चौरस मीटरचा भूखंड देण्यात आला होता. त्या शासकीय जमिनीवर भूविकास बँकेची इमारत उभी आहे. भूखंड आणि इमारत मिळून या बँकेची स्थावर मालमत्ता ही चार कोटी ७ लाख रुपयांची आहे. ही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तांतरित करून घ्यावी असा प्रस्ताव या आधीच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती या बँकेचे अवसायक तथा जिल्हा निबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली.

चोकट

अवसायनात काढण्याचा निर्णय दुर्दैवी

भू-विकास बँक ही शेतकऱ्यांना हक्काची बँक म्हणून होती. विहीर खोदणे, पाईपलाईन टाकणे ट्रॅक्टरसह अन्य अत्याधुनिक मशीन घेण्यासाठी या बँकेने मोठे सहकार्य केले होते. आज यासाठी कुठलीच सरकारी बँक कर्ज देत नाही. त्यामुळे केवळ अडीच एकर शेती असणाऱ्यांना आम्ही त्या काळात ट्रॅक्टरचे वाटप केले होते. त्या काळात संचालक मंडळ असताना या-ना त्या कारणाने ही बँक अवसायनात काढून बँकेचे अस्तित्वच धोक्यात आणल्याने एक शेतकरी म्हणून मोठी खंत वाटत आहे.

नानासाहेब देशमुख, जालना जिल्हा भू-विकास बँकेचे माजी अध्यक्ष, जालना