शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दीड वर्षात ५५ खून..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:19 IST

मागील दीड वर्षात जिल्हाभरात खुनाच्या तब्बल ५५ घटना घडल्या आहेत.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात हाणामाऱ्या, चोºया, दरोड्यांचे सत्र सुरूच आहे. त्यात आता खुनाच्या घटनांमध्येही मोठी वाढ होताना दिसत आहे. मागील दीड वर्षात जिल्हाभरात खुनाच्या तब्बल ५५ घटना घडल्या आहेत.या रक्तरंजित घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेला नियंत्रित करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. दरम्यान, खुनाच्या दाखल ५४ गुन्ह्यांपैकी ५१ प्रकरणांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित प्रकरणांमधील आरोपींनाही जेरबंद करण्यात आले आहे.उद्योगनगरी म्हणून जालन्याची ओळख आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात खुनाच्या घटना वाढत चालल्या आहेत. जमिनीचे वाद, संपत्ती, पूर्ववैमनस्य, किरकोळ कारण, हेवे दावे, अनैतिक संबंध अशा अनेक कारणांवरून एकमेकांचे मुडदे पाडण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. दगडाने ठेचून, शस्त्राचे वार करून निर्दयीपणे खून केले जात आहेत. वाढलेल्या हाणामाऱ्यांसह इतर घटनांना आळा घालण्यासाठीपोलीस प्रशासनाला कडक पावले उचलावी लागणार आहेत.पोलिसांसमोर आव्हान : जून महिन्यात वाढ२०१८ या वर्षात जिल्ह््यात ४१ खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ३८ खुनाच्या घटनांचा उलगडा पोलिसांनी केला आहे. तर २०१९ मध्ये मे महिन्यापर्यंत जिल्हाभरात १४ जणांचा खून झाला आहे. त्यापैकी १३ प्रकरणांचा उलगडा झाला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही प्रमाणात खुनाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र, जून महिन्यात खुनाच्या घटना वाढल्या आहेत. चो-या, दरोड्यांसह खुनाच्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरत असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस