शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘सुपर ३०’ साठी ५३४ विद्यार्थ्यांची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:12 IST

खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आपले आयआयटीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : गुणवत्ता असतानाही होतकरू विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे, यासाठी खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आपले आयआयटीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठीच्या प्रवेशाची १८ शनिवारी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. ५३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.ग्रामीण भागातील गुणवंत हुशार विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणाकडे जात नाही. परिणामी, गुणवंत गुणवत्ता असतांनाही उच्च शिक्षणापासून ही मुले वंचित राहतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आयआयटीचे शिक्षण घेता यावे, यासाठी खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कृषिभूषण विजयअण्णा बोराडे, कृषिभूषण भगवानराव काळे यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, यासाठी ज्या गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घ्याचा आहे. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी तब्बल साडेसातशे विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले.त्यानुसार १८ मे रोजी प्रवेशपूर्व परिक्षा घेण्यात आली. ५३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, त्याचे निकालही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी स्वत: विद्यार्थ्यांचे ओळखपत्र व बैठक व्यवस्थेची पाहणी केली.३० विद्यार्थ्यांना मिळणार संधीयातून तीस विद्यार्थींची निवड करण्यात येणार असून, त्यांची अकरावी व बारावीची सर्व तयारी मोफत केली जाणार आहे. ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना ही मोठी संधी मिळाली आहे.ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, शिक्षक विचारवंत तसेच कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.४जालना जिल्ह्यात आयआयटीची तयारी करण्यासाठी क्लासेस नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यातच बाहेर गावी शिक्षणांसाठी लाखो रुपये खर्च येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची इच्छा असतांनाही त्यांना आयआयटीत प्रवेश घेता येत नाही.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीexamपरीक्षाtechnologyतंत्रज्ञान