शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

‘सुपर ३०’ साठी ५३४ विद्यार्थ्यांची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:12 IST

खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आपले आयआयटीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : गुणवत्ता असतानाही होतकरू विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे, यासाठी खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आपले आयआयटीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठीच्या प्रवेशाची १८ शनिवारी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. ५३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.ग्रामीण भागातील गुणवंत हुशार विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणाकडे जात नाही. परिणामी, गुणवंत गुणवत्ता असतांनाही उच्च शिक्षणापासून ही मुले वंचित राहतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आयआयटीचे शिक्षण घेता यावे, यासाठी खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कृषिभूषण विजयअण्णा बोराडे, कृषिभूषण भगवानराव काळे यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, यासाठी ज्या गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घ्याचा आहे. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी तब्बल साडेसातशे विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले.त्यानुसार १८ मे रोजी प्रवेशपूर्व परिक्षा घेण्यात आली. ५३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, त्याचे निकालही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी स्वत: विद्यार्थ्यांचे ओळखपत्र व बैठक व्यवस्थेची पाहणी केली.३० विद्यार्थ्यांना मिळणार संधीयातून तीस विद्यार्थींची निवड करण्यात येणार असून, त्यांची अकरावी व बारावीची सर्व तयारी मोफत केली जाणार आहे. ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना ही मोठी संधी मिळाली आहे.ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, शिक्षक विचारवंत तसेच कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.४जालना जिल्ह्यात आयआयटीची तयारी करण्यासाठी क्लासेस नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यातच बाहेर गावी शिक्षणांसाठी लाखो रुपये खर्च येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची इच्छा असतांनाही त्यांना आयआयटीत प्रवेश घेता येत नाही.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीexamपरीक्षाtechnologyतंत्रज्ञान