शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त; तक्रारी सोडविताना अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

जालना : एकीकडे कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे शिक्षण विभागातील पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत असून, ...

जालना : एकीकडे कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे शिक्षण विभागातील पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत असून, अनेक शिक्षक, पालकांच्या तक्रारींचा निपटाराही वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

शिक्षण विभागाच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, अधीक्षक यासह इतर विविध पदे शासनाने निर्माण केली आहेत. परंतु, जालना जिल्ह्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मंजूर आठ पैकी सहा पदे रिक्त आहेत. हा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आला आहे. उपशिक्षणाधिकाऱ्यांचेही एक पद रिक्त आहे. शिवाय जिल्ह्यातील शालेय पोषण आहार अधीक्षकांची चार पदे रिक्त आहेत.

तक्रारी सोडवायच्या कोणी?

शाळा सुरू असतानाच अनेक कामचुकार शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती, पालकांसह गावा-गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. कायम अधिकाऱ्यांकडून या तक्रारीनुसार वेळेवर कार्यवाही केली जाते.

शिक्षकांसह शिक्षक संघटनांचेही एक ना अनेक प्रश्न असतात. वेळोवेळी निवेदने, बैठका घेऊन प्रसंगी आंदोलन करून हे प्रश्न मांडले जातात. परंतु, रिक्त पदांमुळे शिक्षकांच्या तक्रारी वेळेत सुटत नाहीत.

रिक्तपदांमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवरही परिणाम होतो. कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढला आहे.

पालक म्हणतात, तक्रार करायची कोठे ?

अनेकवेळा शाळेतील फीसह शिक्षकांच्या असोत किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असोत त्या अनेक पालक करतात. परंतु, प्रभारी अधिकारी असल्यामुळे त्या तक्रारीनुसार संबंधितांवर कारवाई वेळेवर होत नाही.

- बाळासाहेब लटपटे

शाळा, शिक्षक, शालेय पोषण आहार, शालेय फीस यासह इतर अनेक प्रश्न आहेत. या तक्रारी मांडताना प्रभारी अधिकारी असल्याने अडचणी होतात. त्यामुळे शिक्षण विभागामध्ये कायम अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे.

- कल्याण गवळी

शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणतात...

जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे गटशिक्षणाधिकारी प्रभारी आहेत. शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखांची पदेही रिक्त आहेत. रिक्तपदे असल्याने कार्यालयातील कामे प्रलंबित राहत आहेत.

- संतोष राजगुरू, राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक कर्मचारी संघटना

जिल्हा शिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे कामकाजात एक ना अनेक अडचणी येत आहेत. शिक्षकांच्या सेवा पुस्तिका अद्ययावत नाहीत. याचा त्रास शिक्षकांना सहन करावा लागत असून, रिक्तपदे भरावीत.

- राजकुमार दावणगावकर,जिल्हाध्यक्ष कास्ट्राइब शिक्षक संघटना